शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:39 IST

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक

आळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी गतवर्षीप्रमाणेच परंपरेचे पालन करून बसने पूर्ण होणार आहे. असा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे आळंदी ग्रामस्थांकडून स्वागत होत असून घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे.

२ जुलैला तीर्थक्षेत्र आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी दिली आहे. तर मानाच्या दहा पालख्यांसाठी ५० जणांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक पालखीला दोन बसेस याप्रमाणे एकूण दहा पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वारीसंदर्भातील अधिक विस्तृत आदेश शासन लवकरच काढणार आहेत. 

यापार्श्वभूमीवर यंदाही माऊलींची पालखी (चलपादुका) बसमधूनच पंढरपूरकडे जाणार आहे. वारी संबंधित घटक व मर्यादित वारकऱ्यांव्यतिरिक्त इतर वारकरी प्रस्थान सोहळ्याला तसेच दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

यंदा आषाढी वारीसाठी संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर - अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर), संत चांगटेश्वर महाराज (सासवड) या दहा मानाच्या पालख्या पंढरीला विठुचरणी जाणार आहेत.

" आषाढी वारी संबंधित सर्व घटकांशी तसेच वारकऱ्यांची मते देवस्थानने जाणून घेऊन प्रशासनाकडे मांडली होती. राज्यसरकारने सर्व घटकांचा विचार करून वारी संदर्भातील निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदाय हा कधी एकट्याचा विचार करत नाही. वारकरी संप्रदाय समाजाचे हित सांभाळतो. प्रस्थान संदर्भातील अधिक तपशीवार नियोजन लवकरच देवस्थान ठरवील. प्रथेप्रमाणे नियोजित तारखेलाच माऊलींचे प्रस्थान होईल.                                       - डॉ.अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी.

" राज्य शासनाने यंदाची आषाढी वारी गतवर्षी प्रमाणे बसने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आळंदीतील मानकरी म्हणून आम्ही स्वागत करतो. कोरोनाला कायमस्वरूपी संपवायचे असेल तर अशाच कौतुकास्पद निर्णयाची गरज होती.                                    - पांडुरंग कुऱ्हाडे, मानकरी आळंदी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuदेहूAlandiआळंदीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी