शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 14:30 IST

वारीतून वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, मतदान हक्क बजवा आदी सामाजिक विषयावर जनजागृती

बी.एम. काळे

जेजुरी : जगात अशक्य असे काहीच नाही असे आपण म्हणत असतो, मात्र ते शक्य करण्याबाबत मात्र आपली नेहमी उलटी चाल असते. म्हणने सोपे असते, करणे अशक्यप्राय वाटते, मात्र यंदा आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर आज असा एक उंचापुरा, बलदंड देहयष्टी असणारा, एम ए.( समाजशास्त्र ) उच्च शिक्षित,  अगदी कानाच्या पाळीपर्यंत पोहोचलेल्या कल्लेदार मिशांचा मुसाफिर आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी करतोय.  होय, उलटे पायी चालत तो वारी करतोय, त्याचे नाव आहे बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड, ( वय ५५ वर्षे)  रा. फुरसुंगी, पुणे. आज त्याने जेजुरी ओलांडून निरेकडे प्रस्थान ठेवलेय. 

आयुष्यात काहीतरी करायचे असे अनेकांना वाटत असते. त्यानुसार प्रयत्न ही सुरू होतो, मात्र पुन्हा तर अर्धवट राहते. मात्र या अवलियाने वयाच्या १६ व्या वर्षांपासून वारी सुरू केली आहे. पंढरीची वारी त्यासाठी आषाढी एकादशीच हवी असे नाही तर जेव्हा जेव्हा मनात येईल की आता आपण जनजागृतीसाठी बाहेर पडायला हवे, तेव्हा तेव्हा हा अवलिया घराबाहेर पडून उलटी पायी चालत वारी सुरू करतो. आजची त्याची ही ४३ वी वारी आहे. 

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, आरोग्य आणि स्वच्छता पाळा, मेरा देश मेरा परिवार या न्यायाने जगा, जगताना मतदान मात्र जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा ते करा. मतदान हा हक्क बजवायला विसरू नका आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यासाठीच ही वारी करीत असल्याचे गुंड सांगतात. देवाची भक्ती करतो,तेवढ्याच मनोभावे भारत मातेची ही भक्ती करण्याची शिकवण आपल्या जनजागृती वारीतून देणाऱ्या बापूराव गुंड यांनी आजपर्यंत आपला फुरसुंगी येथील छोटासा कपड्याचा व्यवसाय सांभाळता सांभाळता जनजागृतीसाठी पुणे ते जंतर मंतर दिल्ली अशी २०१७ आणि २०२२  असे दोनवेळा वारी केलेली आहे. मुंबई मंत्रालयापर्यंत ६ वेळा, शिखरी काठ्यांच्या यात्रेत ६ वेळा, यावर्षी  नवरात्रात दरवर्षी पुणे ते तुळजापूर अशी वाऱ्या केल्या आहेत. 

उलटे चालत वारी करताना त्यांच्या विलक्षण पेहरावा कडे पाहून कुतूहलाने प्रवाशी त्यांच्या संपर्कात येतात. ,बोलतात यातून परिणामकारक जनजागृती होत आहे. या अनेक वाऱ्यातून त्यांनी अपघात का आणि कशामुळे होतात याचे अनेक अनुभव घेतले आहेत.  लोकमत च्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे एकच विनंती केली आहे. ' सरकार, अपघात रोखण्यासाठी रस्त्यांची करोडो रुपये खर्च करून कामे करतात. पण अपघात थांबले नाहीत. शासन अपघात रोखण्यासाठी काम करते की घडवण्यासाठी काम करते. हेच समजत नाही. शासकीय प्रतिनिधींनी खरेच अपघात रोखण्यासाठी काम करीत असतील तर मला जरुर भेटावे. वस्तुस्थिती मी सांगेन असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022environmentपर्यावरणSocialसामाजिकGovernmentसरकार