शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

"आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या", अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:37 IST

कसब्यात तीन वेळा निवडणूक लढवली आहे तर आता का नाही लढवायची

पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीला आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. तरीही काँग्रेसची काहीच हालचाल दिसत नाही. मग आपली तिथे ताकद आहे, तीन वेळा निवडणूक लढवली आहे, आताही आपली तयारी आहे तर निवडणूक का लढवायची नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना गुरूवारी दुपारी नेते अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. पवार यांनी तिथूनच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून कार्यकर्त्यांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या असे सांगितले.

कसबा विधानसभेची पोटनिवडणुक २६ फेब्रुवारीला होत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची किंवा कसे याबाबतीत अजूनही काहीच निर्णय झालेला नाही. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासंबधी कोणताही ठोस हालचाल दिसायला तयार नाही. आघाडीची म्हणून एकही बैठक झालेली नाही. मात्र काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनीही पवार यांच्याकडे मागणी करत आपणच निवडणूक का लढवू नये असा प्रश्न केला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पक्षाचे माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवली होती. तिथे पक्षाचे काम आहे, ताकद आहे. निवडणूक जिंकण्याची संधी आहे असे मत यावेळी इच्छुकांनी व्यक्त केले.

पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. मागील वेळच्या विधानसभा पोटनिवडणुकीची माहिती घेतली. महाविकास आघाडी आहे, एकत्रित बैठक होईल, त्यात निर्णय होईल असे सांगत पवार यांनी बैठकीतूनच प्रदेशाध्यक्ष पाटील यांना फोन लावला व इच्छुकांचे म्हणणे त्यांना सांगितले. काँग्रेस व शिवसेना यांच्याबरोबर एकत्रित बैठक आयोजित करून त्यात काय तो निर्णय घ्यावा असे त्यांनी पाटील यांना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक