शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या", अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:37 IST

कसब्यात तीन वेळा निवडणूक लढवली आहे तर आता का नाही लढवायची

पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीला आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. तरीही काँग्रेसची काहीच हालचाल दिसत नाही. मग आपली तिथे ताकद आहे, तीन वेळा निवडणूक लढवली आहे, आताही आपली तयारी आहे तर निवडणूक का लढवायची नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना गुरूवारी दुपारी नेते अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. पवार यांनी तिथूनच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून कार्यकर्त्यांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या असे सांगितले.

कसबा विधानसभेची पोटनिवडणुक २६ फेब्रुवारीला होत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची किंवा कसे याबाबतीत अजूनही काहीच निर्णय झालेला नाही. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासंबधी कोणताही ठोस हालचाल दिसायला तयार नाही. आघाडीची म्हणून एकही बैठक झालेली नाही. मात्र काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनीही पवार यांच्याकडे मागणी करत आपणच निवडणूक का लढवू नये असा प्रश्न केला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पक्षाचे माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवली होती. तिथे पक्षाचे काम आहे, ताकद आहे. निवडणूक जिंकण्याची संधी आहे असे मत यावेळी इच्छुकांनी व्यक्त केले.

पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. मागील वेळच्या विधानसभा पोटनिवडणुकीची माहिती घेतली. महाविकास आघाडी आहे, एकत्रित बैठक होईल, त्यात निर्णय होईल असे सांगत पवार यांनी बैठकीतूनच प्रदेशाध्यक्ष पाटील यांना फोन लावला व इच्छुकांचे म्हणणे त्यांना सांगितले. काँग्रेस व शिवसेना यांच्याबरोबर एकत्रित बैठक आयोजित करून त्यात काय तो निर्णय घ्यावा असे त्यांनी पाटील यांना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक