शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

साप सोडायला आंदोलन करीत आहे का?, अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 01:16 IST

पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार होते. त्या वेळी साप सोडणार असल्याचे वक्तव्य काही जण करतात.

बारामती : पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार होते. त्या वेळी साप सोडणार असल्याचे वक्तव्य काही जण करतात. याबाबतच्या संभाषणाची क्लिप उघड करून हा आरोप सिद्ध करावा. संबंधित कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई करण्यास भाग पाडू. त्यामुळे तथ्यहीन वक्तव्ये करू नयेत. हा समाज साप सोडायला आंदोलन करीत आहे का? राजकीय पोळी भाजण्यासाठी खालच्या स्तरावरचे राजकारण कोणत्याही घटकाला ते पटणार नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.माळेगाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला पवार यांनी भेट देऊन सहभाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज राज्यात परिस्थिती अस्थिर झाली आहे. मी सुद्धा ४ वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. आमच्या काळात ६ वा वेतन आयोग लागू झाला. मात्र, ७ व्या वेतन आयोगासाठी कशाला वेळ लावला आहे. राज्यातील तृतीय, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी ३ दिवसांपासून संपावर आहेत. हे राज्य सरकारचे अपयश आहे.पवार पुढे म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाचे लाखोंचे मोर्च शांततेत निघाले. जगाने या शांततेतील मोर्चाची नोंद घेतली. या मोर्चाला कोणताही नेता नाही. स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन सुरू आहे. शिक्षण, नोकरीसाठी आरक्षणाची आंदोलकांची मागणी आहे. मात्र, सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण, दिरगांई, वेळीच न निर्णय घेतल्यामुळे हे प्रश्न राज्यात निर्माण होतआहेत. केंद्रात, राज्यात भाजपाचे पूर्ण बहुमत आहे.५२ टक्के आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावे ही भूमिका आहे. आरक्षणाचा विषय सुरु असताना न्यायालयात बाजू व्यवस्थित का मांडली नाही, राज्य सरकारच्या वतीने आरक्षणासाठी न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी १७ महिने लावल्याची टीका पवार यांंनी केली.मागील सरकारने आम्ही दिलेले आठ महिने आरक्षण टिकले. मात्र, साडेतीन वर्षांत याबाबत अभ्यास करून आवश्यक खबरदारी घेतली नाही. राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली. नोकऱ्या मिळत नाहीत. नोकºया मिळाल्या असत्या तर आरक्षणाची मागणी पुढे आली नसती. अनेकांच्या नोकºया गेल्या, नोटाबंदीचा कोणताही उपयोग नाही. मंदीमुळे उठाव नाही, या चक्रात आजचे मुले-मुली अडकले आहेत. त्यांची उमेदीची वय निघून चालली आहेत. वय निघून गेल्यावर नोकरी कोण देणार, असा प्रश्न या मुलामुलींना पडला आहे.>९ लाख शिक्षकांच्याजागा देशात रिक्त१५ वर्षे त्यांचे सरकार नव्हते. त्यामुळे मतासाठी केवळ हो म्हणायचे धोरण होते. देशात २५ लाख नोकºया रिक्त, ९ लाख शिक्षकांच्या जागा देशात रिक्तआहे. नवीन भरती करण्यासाठी परवानगी नाही. हे सरकार केवळ समायोजन चालल्याचे सांगतात. सरकारचे धोरण त्यांच्यावरच अंगावर येत आहे.>...तर मग काय बोलणार?शेतकरी अस्वस्थ आहेत. स्वत: सहकारमंत्र्यांनी त्यांच्या कारखान्याचे एफआरपी १६ कोटी रुपये दिले नाहीत, असे सांगतात. याबाबत नुकतेच एका वृत्तपत्राचे वृत्त वाचनात आले. साखर कारखान्यांच्याएफआरपीचा कायदा आहे. मात्र,त्या खात्याचे मंत्रीच उस उत्पादकांना पैसे देऊ शकत नसतील तर काय बोलणार, असा देखील सवाल अजित पवार यांनी केला आहे....त्यांना सर्वांना खेळवायचे आहेमुस्लिमांना शैक्षणिक आरक्षणासाठी उच्च न्यायालयाने मान्यतादिली आहे. मग शिक्षणासाठी मुस्लिमांना आरक्षण द्यायला हरकतआहे. मात्र, राज्य सरकार ते देत नाही. त्यांना सर्वांना खेळवायचे आहे.स्वत: त्यांचे नेते हा चुनावी जुमला असल्याचे सांगत असल्याचेअजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण