शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

साप सोडायला आंदोलन करीत आहे का?, अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 01:16 IST

पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार होते. त्या वेळी साप सोडणार असल्याचे वक्तव्य काही जण करतात.

बारामती : पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार होते. त्या वेळी साप सोडणार असल्याचे वक्तव्य काही जण करतात. याबाबतच्या संभाषणाची क्लिप उघड करून हा आरोप सिद्ध करावा. संबंधित कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई करण्यास भाग पाडू. त्यामुळे तथ्यहीन वक्तव्ये करू नयेत. हा समाज साप सोडायला आंदोलन करीत आहे का? राजकीय पोळी भाजण्यासाठी खालच्या स्तरावरचे राजकारण कोणत्याही घटकाला ते पटणार नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.माळेगाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला पवार यांनी भेट देऊन सहभाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज राज्यात परिस्थिती अस्थिर झाली आहे. मी सुद्धा ४ वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. आमच्या काळात ६ वा वेतन आयोग लागू झाला. मात्र, ७ व्या वेतन आयोगासाठी कशाला वेळ लावला आहे. राज्यातील तृतीय, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी ३ दिवसांपासून संपावर आहेत. हे राज्य सरकारचे अपयश आहे.पवार पुढे म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाचे लाखोंचे मोर्च शांततेत निघाले. जगाने या शांततेतील मोर्चाची नोंद घेतली. या मोर्चाला कोणताही नेता नाही. स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन सुरू आहे. शिक्षण, नोकरीसाठी आरक्षणाची आंदोलकांची मागणी आहे. मात्र, सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण, दिरगांई, वेळीच न निर्णय घेतल्यामुळे हे प्रश्न राज्यात निर्माण होतआहेत. केंद्रात, राज्यात भाजपाचे पूर्ण बहुमत आहे.५२ टक्के आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावे ही भूमिका आहे. आरक्षणाचा विषय सुरु असताना न्यायालयात बाजू व्यवस्थित का मांडली नाही, राज्य सरकारच्या वतीने आरक्षणासाठी न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी १७ महिने लावल्याची टीका पवार यांंनी केली.मागील सरकारने आम्ही दिलेले आठ महिने आरक्षण टिकले. मात्र, साडेतीन वर्षांत याबाबत अभ्यास करून आवश्यक खबरदारी घेतली नाही. राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली. नोकऱ्या मिळत नाहीत. नोकºया मिळाल्या असत्या तर आरक्षणाची मागणी पुढे आली नसती. अनेकांच्या नोकºया गेल्या, नोटाबंदीचा कोणताही उपयोग नाही. मंदीमुळे उठाव नाही, या चक्रात आजचे मुले-मुली अडकले आहेत. त्यांची उमेदीची वय निघून चालली आहेत. वय निघून गेल्यावर नोकरी कोण देणार, असा प्रश्न या मुलामुलींना पडला आहे.>९ लाख शिक्षकांच्याजागा देशात रिक्त१५ वर्षे त्यांचे सरकार नव्हते. त्यामुळे मतासाठी केवळ हो म्हणायचे धोरण होते. देशात २५ लाख नोकºया रिक्त, ९ लाख शिक्षकांच्या जागा देशात रिक्तआहे. नवीन भरती करण्यासाठी परवानगी नाही. हे सरकार केवळ समायोजन चालल्याचे सांगतात. सरकारचे धोरण त्यांच्यावरच अंगावर येत आहे.>...तर मग काय बोलणार?शेतकरी अस्वस्थ आहेत. स्वत: सहकारमंत्र्यांनी त्यांच्या कारखान्याचे एफआरपी १६ कोटी रुपये दिले नाहीत, असे सांगतात. याबाबत नुकतेच एका वृत्तपत्राचे वृत्त वाचनात आले. साखर कारखान्यांच्याएफआरपीचा कायदा आहे. मात्र,त्या खात्याचे मंत्रीच उस उत्पादकांना पैसे देऊ शकत नसतील तर काय बोलणार, असा देखील सवाल अजित पवार यांनी केला आहे....त्यांना सर्वांना खेळवायचे आहेमुस्लिमांना शैक्षणिक आरक्षणासाठी उच्च न्यायालयाने मान्यतादिली आहे. मग शिक्षणासाठी मुस्लिमांना आरक्षण द्यायला हरकतआहे. मात्र, राज्य सरकार ते देत नाही. त्यांना सर्वांना खेळवायचे आहे.स्वत: त्यांचे नेते हा चुनावी जुमला असल्याचे सांगत असल्याचेअजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण