शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 16:15 IST

आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी आचारसंहिता आड येत नाही..

ठळक मुद्देप्रथम घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना मदत : सध्या वीजपुरवठा खंडित ...धरणाच्या इतिहासात प्रथमच मोठा पाऊस ... उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग

बारामती : पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांना बारामतीच्या पुरस्थितीबाबत माहिती दिली. बारामती येथे खुद्द पवार यांनीच पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.पवार यांनी तत्पुर्वी शहरातील पुरग्रस्तांची भेट घेवुन चर्चा केली.पुरग्रस्तांना पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, नुकतीच मुख्यमंत्र्यांशी पुरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांना याबाबत रिपोर्ट करण्यात आला आहे.पुरग्रस्तांना मदतीसाठी आचारसंहितेची अडचण येवु नये,यासाठीत्यांना विनंती करण्यात आली आहे. आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी  आचारसंहिता आड येत नाही ,असे पवार म्हणाले. शहरात जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक थांबुन आहेत.शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे.प्रथम घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना मदत केली जाईल. त्यानंतर शेतीचे पंचनामे केले जाईल. सध्या वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.लवकरच तो पूर्ववत केला जाईल,असे पवार म्हणाले.——————————————...धरणाच्या इतिहासात प्रथमच मोठा पाऊस बुधवारी(दि २५)  रात्री १० ते ११ च्या दरम्यान, पुरंधर ताुलक्यातली गराडे येथे ढगफुटी झाली.यावेळी साडेंचार ते पावणे पाच इंच ऐवढा प्रचंडपाऊस एक  तासात  पडला. मधल्या काळात गराडे आणि इतर धरणे भरली गेलेलीहोती. रात्री सगळ्या पावसाचे नदीच्या कऱ्हा पात्रात उतरले.कऱ्हा नदीतीलपाणी शेवटी  पाणी नाझरेमध्ये आले.त्यामुळे  वरुन येणारे पाणी ८५ हजार क्युसेक्सचे झाले.
त्यामुळे नाझरेतुन येणारे पाणी ८५ हजार क्युसेक्सने  पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणाची क्षमता देखील ८५ हजार क्यूसेक्स आहे. नाझरेतील पाणी बारामतीत येण्यास ८ ते १० तास लागतात.नाझरेतील कऱ्हा नदीत सोडण्यात येणारा  विसर्ग रात्री ८५ हजार क्युसेक्सवरुन ते पाणी ३५ हजार क्युसेक्स करण्यात आला  आहे.त्यानंतर  हाच विसर्ग ३५ हजाराचा विसर्ग २० हजार क्युसेक्स करण्यात आला. आताच्या घडीला १४ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. गेट बंद झाल्यावर एक ठीपका पाणी येणार नाहि. नाझरे परीसरात रात्री अचानक पाऊस पडला,ते पाणी नाझरेत आल्यास नदीच्या पात्रात मावेल एवढेच पाणी नदी पात्रात येईल. त्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.———————————... उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्गकऱ्हा आणि निराचा संगम सोनगाव परिसरात होतो.त्या ठिकाणी देखील दिवसा पाणी वाढेल,रात्री पाणी कमी होईल. नाझरेचे पाणी जवळपास १० ते १२ हजारक्युसेक्स ने सुरु आहे.ते देखील लवकरच बंद होईल. तसेच, निरेचे पाणी आता  बंद होईल.पुणे शहरातील पाणी उजनीमध्ये सोडले जाते.दौंड मार्गे ते पाणी उजनी जलाशयात पोहचण्यासाठीआवश्यक कालावधी गृहित धरुन उजनीतील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आज सकाळी उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग आहे.त्यामुळे पुण्यातील पाणी उजनी पात्रात आल्यानंतर देखील काळजी करण्याचे कारण नाही,असे  अजित पवार यांनी सांगितले.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPurandarपुरंदरRainपाऊसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस