शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

महाराष्ट्रातील दोन अग्निवीर अजित पवार अन् एकनाथ शिंदे; निरंजन टकले यांचा टोला

By श्रीकिशन काळे | Published: April 26, 2024 6:50 PM

केंद्र सरकारने देशात रोजगार देऊ असे आश्वासन दिले, पण उलट लोकांना बेरोजगार केले

पुणे : केंद्र सरकारने लष्करामध्ये अग्निवीर ही पध्दत आणली. त्यामुळे लष्कराला दुर्बल केले जात आहे. ही पध्दत रद्दच केली पाहिजे. खरंतर महाराष्ट्रातही भाजपने दोन अग्निवीर आणले आहेत. त्यामध्ये एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे आहेत. दोघांनाही चार वर्षे दिली असून, दोन-दोन वर्षे त्यांना आहेत,’’ असा टोला काॅंग्रेसचे स्टार प्रचारक व ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लगावला.

काॅंग्रेस भवन येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, केंद्र सरकारने अतिशय वाईट काम केले असून, देशावरील कर्ज वाढवले आहे. यापूर्वी २५ हजार कोटींचे सोने गहाण ठेवण्याचे कर्ज होते, ते आता १ लाख २५ हजार कोटींवर पोचले आहे. यावरून लक्षात येईल १ लाख कोटीच्या कर्जाचा बोजा देशावर वाढवला आहे. तसेच देशात रोजगार देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते. पण उलट लोकांना बेरोजगार केले. आता तर लष्करातही हीच योजना अग्निवीर नावाने आणली आहे. त्याने लष्कर दुबळे होणार आहे. ही योजना रद्द झालीच पाहिजे.’’

सध्या माध्यमांवर दबाव टाकून त्यांच्यावर बंधने घातली जात आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांना संपवले. कोणी आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी संसदेतील प्रश्नोत्तरांचा तासच बंद केला. दुसरीकडे देशात धार्मिकतेवरून द्वेष पसरवला जात आहे. त्यांना संविधान बदलाचे आहे आणि मनुस्मृतीप्रमाणे देश चालवायचा आहे. पण पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आणि त्यांचे धाबे दणाणले आहे. ते केवळ टीका करताना दिसत आहेत. पण सरकारने गेल्या काही वर्षांतील ध्येय साध्य केली, त्यावर काहीच बोलत नाहीत. कारण त्यांनी काहीच काम केलेले नाहीय. त्यामुळे भाजपला देशात चारशेपार नाही तर दोनशेपर्यंत जागा मिळतील.’’

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र