शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 08:00 IST

मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़

ठळक मुद्देकेरळ, झारखंडमध्ये सर्वांत कमी पाऊस : ७१ जिल्ह्यांकडे पावसाची पाठ

विवेक भुसेपुणे : मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़. ७१ जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी पडला असल्याने तेथे दुष्काळाचे सावट आताच दिसू लागले आहे़ देशातील २८० जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.

मॉन्सूनचे आगमन यंदा उशीर झाल्याने जून महिन्यात सर्वत्र पाऊस कमी झाला होता़ पण, जुलैचा अर्धा महिना सरला तरी काही भाग वगळता देशभरात पावसाचे प्रमाण सर्वत्र कमी आहे़ १५ जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण भारत व्यापतो़ यंदा उशीरा येऊनही मॉन्सूनने राजस्थान, पंजाबचा काही भाग सोडला तर संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे़ सध्या मॉन्सून ईशान्यकडील राज्यांमध्ये सक्रीय आहे़ १ जून ते १५ जुलैपर्यंत हवामान विभागाचे ३६ विभागापैकी केवळ २ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ त्याचे एकूण क्षेत्र हे देशाच्या केवळ ५ टक्के इतके आहे़ सरासरीपेक्षा १९ अधिक  ते  १९ टक्के कमी पाऊस १५ विभागात पडला असून त्यात देशातील ४४ टक्के भुभागाचा समावेश होतो़ तर १९ हवामान विभागात (-५९ ते -२० टक्के) पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़ त्यात देशातील ५१ टक्के भुभाग येतो़.

मॉन्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ राज्यात होते़ यंदा मात्र केरळमधील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला असून एक जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़ केरळमध्ये १५ जुलैपर्यंत सर्वसाधारण १ हजार मिमी पाऊस पडतो़ .यंदा मात्र जवळपास निम्माच पाऊस आतापर्यंत झाला़ झारखंडमधील २४ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये कमी तर १ जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़. आंध्र प्रदेशातील १३ पैकी १० जिल्हे, तेलंगणातील ३१ पैकी २३ जिल्ह्यात कमी पाऊस आहे़. एका बाजूला पंजाबातील जोरदार पाऊस असताना दिल्लीत आतापर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे़. त्याच्या शेजारील हरियानामधील २१ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून ४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे़. तेलंगणा हा मराठवाड्याप्रमाणेच पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भुभाग़ तेथील २१ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये ५९ ते २० टक्के कमी पाऊस पडला असून २ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे़ एका बाजूला मॉन्सूनचे उशीरा झालेले आगमन व अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात आतापर्यंत केवळ एकदाच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़ या आठवड्यात पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता नाही़. 

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसFarmerशेतकरी