शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 08:00 IST

मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़

ठळक मुद्देकेरळ, झारखंडमध्ये सर्वांत कमी पाऊस : ७१ जिल्ह्यांकडे पावसाची पाठ

विवेक भुसेपुणे : मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़. ७१ जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी पडला असल्याने तेथे दुष्काळाचे सावट आताच दिसू लागले आहे़ देशातील २८० जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.

मॉन्सूनचे आगमन यंदा उशीर झाल्याने जून महिन्यात सर्वत्र पाऊस कमी झाला होता़ पण, जुलैचा अर्धा महिना सरला तरी काही भाग वगळता देशभरात पावसाचे प्रमाण सर्वत्र कमी आहे़ १५ जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण भारत व्यापतो़ यंदा उशीरा येऊनही मॉन्सूनने राजस्थान, पंजाबचा काही भाग सोडला तर संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे़ सध्या मॉन्सून ईशान्यकडील राज्यांमध्ये सक्रीय आहे़ १ जून ते १५ जुलैपर्यंत हवामान विभागाचे ३६ विभागापैकी केवळ २ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ त्याचे एकूण क्षेत्र हे देशाच्या केवळ ५ टक्के इतके आहे़ सरासरीपेक्षा १९ अधिक  ते  १९ टक्के कमी पाऊस १५ विभागात पडला असून त्यात देशातील ४४ टक्के भुभागाचा समावेश होतो़ तर १९ हवामान विभागात (-५९ ते -२० टक्के) पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़ त्यात देशातील ५१ टक्के भुभाग येतो़.

मॉन्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ राज्यात होते़ यंदा मात्र केरळमधील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला असून एक जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़ केरळमध्ये १५ जुलैपर्यंत सर्वसाधारण १ हजार मिमी पाऊस पडतो़ .यंदा मात्र जवळपास निम्माच पाऊस आतापर्यंत झाला़ झारखंडमधील २४ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये कमी तर १ जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़. आंध्र प्रदेशातील १३ पैकी १० जिल्हे, तेलंगणातील ३१ पैकी २३ जिल्ह्यात कमी पाऊस आहे़. एका बाजूला पंजाबातील जोरदार पाऊस असताना दिल्लीत आतापर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे़. त्याच्या शेजारील हरियानामधील २१ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून ४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे़. तेलंगणा हा मराठवाड्याप्रमाणेच पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भुभाग़ तेथील २१ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये ५९ ते २० टक्के कमी पाऊस पडला असून २ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे़ एका बाजूला मॉन्सूनचे उशीरा झालेले आगमन व अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात आतापर्यंत केवळ एकदाच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़ या आठवड्यात पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता नाही़. 

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसFarmerशेतकरी