शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 2:35 PM

शरद पवारांच्या कामाचा आवाका, माणसं जोडणं, वेळ आणि शिस्त पाळण्याची त्यांच्या सवयी अनेक गोष्टी शिकवून गेल्या

- मी १९५८ मध्ये बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये मॅट्रिकनंतर प्रवेश घेतला. त्याच वर्षी बारामती सारख्या छोट्या भागातून साहेब (शरद पवार) यांनी देखील प्रवेश घेतला होता. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. वर्ग प्रतिनिधीची निवडणूक होती. मी पुण्याचा शालेय जीवनात खेळात आघाडीवर होतो. त्यामुळे सर्वांना परिचित देखील होतो. त्यामुळे आपणच विजयी होऊ, याची मला खात्री होती. त्यावेळी साहेब आणि माझ्यात निवडणूक झाली. मी विजयी होणार या आत्मविश्वासात होतो. तर साहेब विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत प्रचार करत होते. जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा साहेब ८० टक्के मत मिळवत विजयी झाले होते. पराभवाने मी काहीसा नाराज झालो होतो. साहेब माझ्याकडे आले आणि म्हणाले, विठ्ठल निवडणूक तर झाली; पण आपल्याला एकत्र काम करायचे आहे. तेव्हापासून आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या, त्याला आता ६५ वर्ष होत आली. निवडणुकीतील पराभवाने मला साहेबांसारखा मित्र मिळाला.

साहेबांच्या नेतृत्वगुणाचे झलक त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दिसत होती. चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी पुढाकार घेत पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला. तब्बल सात ते आठ हजार विद्यार्थी त्यांनी गोळा केले होते. आमच्या महाविद्यालयातच नाही तर इतर महाविद्यालयात देखील पवार पॅनल उभे राहिले. मी देखील या पॅनलमधून निवडणुका लढल्या. साहेब पुढे आमदार झाले, मुख्यमंत्री झाले. त्यांचा कामाचा आवाका, माणसं जोडणं, वेळ आणि शिस्त पाळण्याची त्यांच्या सवयी अनेक गोष्टी शिकवून गेल्या.

शरदरावांना ‘साहेब’ म्हणू लागलो...

साहेबांना मी शरदराव म्हणून संबोधित असे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना साहेब म्हणू लागलो. तेव्हा ते म्हणाले अरे हे काय? मी उत्तर दिले. तुम्ही मित्र असला तरी आता मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्र्यांना नावाने आवाज कसा देणार मी? तुम्हाला नावाने आवाज दिलेला चालेल मात्र लोक काय म्हणतील? त्यांनी नावाने आवाज देण्याविषयी आग्रह केला. मात्र मी साहेब म्हणण्यावर कायम राहिलो. शेवटी ते म्हणाले ठीक आहे. मात्र, मग मी पण तुला विठ्ठलशेठ म्हणणार.

‘ते’ मैत्रीचे दिवस पुन्हा अनुभवतो

आमच्या मैत्रीला ५० वर्षे झालीत तेव्हा सर्व मित्रांनी सहपरिवार दरवर्षी दोन दिवस तरी एकत्र भेटायचे असे ठरले. सर्व मित्र सहपरिवार आम्ही कोकण नाहीतर इतर ठिकाणी जातो. तेथे बाहेरचे जग विसरून मैत्रीच्या जुन्या दिवसांत पुन्हा हरवून जातो आणि पुन्हा दोन दिवसांनंतर पुन्हा आपापल्या जगात परततो.

साहेबांनी पराभव केल्याने नाव इतिहासात

निवडणुकीत पराभव झाला की तो उमेदवार आयुष्यभर नाराज होतो. पण मला माझ्या पराभवाने साहेबांसारखा मित्र मिळाला. मागे वळून पाहताना वाटेत साहेब कोणतीही निवडणूक हरले नाही. त्यांनी पहिली निवडणूक माझ्या विरोधात जिंकली. त्या अर्थाने माझे नाव इतिहासात कोरले गेले.                                                                                                                                    (शब्दांकन : रोशन मोरे)

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारbusinessव्यवसायPoliticsराजकारणFriendship Dayफ्रेंडशिप डे