शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना सोडले वा-यावर, शिक्षक घेतले काढून : पर्यायी व्यवस्थाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 06:27 IST

रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्याला ७ महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.

दीपक जाधव ।पुणे : रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्याला ७ महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना त्यांना शिकवायला शासनाने शिक्षकच दिलेले नाहीत. यामुळे रात्रशाळांत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.हॉटेल, गॅरेज, मॉल, दुकाने आदी ठिकाणी काम करणाºया हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे बंद पडलेले शिक्षण रात्रशाळांमुळे पुन्हा सुरू करता येते. रात्रशाळांमधून शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर गेलेल्यांची संख्याहीमोठी आहे. देशात रात्रशाळा ही संकल्पना राबविणारे महाराष्टÑपहिले राज्य आहे. त्यानंतर इतर राज्यांनी याचे अनुकरण करून रात्रशाळा सुरू केल्या; मात्र या रात्रशाळा व महाविद्यालये बंद पाडण्याची परिस्थिती सध्याच्या शासनाकडून निर्माण केली जात आहे.राज्यात १७६ अनुदानित रात्र शाळा-महाविद्यालये असून, त्यामध्ये ३३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये २१०० शिक्षक कार्यरत होते, त्यापैकी दुबार नोकरी करणाºया १४५६ शिक्षकांची सेवा संपुष्टात आणण्यात आली. त्या शिक्षकांच्या जागांवर पर्यायी शिक्षकांची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. राज्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेरात्रशाळेमध्ये समायोजन केले जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार काही जागांवर डी.एड. पात्रताधारक शिक्षक पाठविण्यात आले; मात्र ८ वी ते १२ वी साठीचे बी.एड.चे शिक्षक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.दहावी व बारावी ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष आहेत. त्यांची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही अद्याप त्यांना गणित व इंग्रजी विषयांचे शिक्षक उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. रात्रशाळांमध्ये शिक्षणाची ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थी त्यांच्या शिक्षणालाच रामराम करण्याची भीती निर्माण झाली.सुरुवातीच्या काळात दिवसा इतर शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक रात्रशाळांमध्ये जाऊन जादाचे वर्ग घेत होते. त्याबदल्यात शासनाने त्यांना या कामाचे अर्धे वेतन देण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार दिवसा शिकविणाºया शिक्षकांना रात्रशाळेत नोकरी करण्याची मुभा देण्यात आली; मात्र तडकाफडकी निर्णय घेऊन दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली. रात्रशाळांबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना त्याची कोणतीही पूर्वतयारी शासनाने केली नाही.हलाखीच्या परिस्थितीमुळे रात्रशाळेतून शिक्षणपुणे शहरात आबासाहेब अत्रेरात्र प्रशाला व महाविद्यालय, पूना नाईट हायस्कूल व कॉलेज, जोसेफ नाईट स्कूल, पुणे मनपा नि. बा. किंकर रात्र प्रशाला, चिंतामणी रात्र प्रशाला व महाविद्यालय आहे. येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.गावाकडे अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने पुण्यात कामधंदा करण्यासाठी अनेक मुले, तरुण आले आहेत. इथं हॉटेल, गॅरेज, दुकानांमध्ये नोकºया करून, ते रात्र शाळेत शिक्षण घेत आहेत.सर्व शिक्षा अभियानाचे ढोल बजावणाºया शासनाकडून या मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.त्यांचा पगार कुठून देणार?रात्रशाळा व महाविद्यालयांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर तात्पुरते शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काही संस्थांकडून केला जात आहे; मात्र एका शिक्षकाला किमान दहा हजार रुपये वेतन द्यावे लागते.एका शाळेमधील किमान ८ ते १० शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या शिक्षकांच्या वेतनापोटी दरमहा लाख रुपये खर्च करण्याचा भार या संस्थांना उचलणे अवघड आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाPuneपुणे