शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य

By निलेश राऊत | Updated: June 15, 2023 16:35 IST

राज्यातील सरकारमध्ये कुठलाही वाद नाही...

पुणे : ‘केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आम्ही तीन कामांना प्राधान्य दिले. यात जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम हटविले, राममंदिर उभारणी केली व आता लक्ष हे देशात समान नागरिक कायदा करण्यावर आहे,’ अशी माहिती उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मौर्य यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मौर्य म्हणाले, ‘भारत आज जगातील पाचवी अर्थव्यवस्था असून, हा गौरव मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे; परंतु, राहुल गांधी दुसऱ्या देशात जाऊन भारताची निंदा करीत आहेत. भारताची निंदा करण्यापेक्षा राहुल गांधी यांना आमचे आव्हान आहे की, आपल्या पक्षांसह आमच्या विचारधारेला विरोध करावा; पण २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हटविण्यासाठी काँग्रेसकडे एकही मुद्दा नाही. सन २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले असून, उत्तरप्रदेशमधून ७५ पेक्षा जास्त जागा मिळतील. तसेच महाराष्ट्रात ४८ पैकी आम्ही ४५ जागा जिंकू व देशात ३५० पेक्षा जास्त खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील सरकारमध्ये कुठलाही वाद नाही...राज्यात भाजप- सेना युती असताना उद्धव ठाकरे यांनी धाेका दिला. आज ज्यांचे पाच खासदारही निवडून येत नाही ते सध्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत असल्याची टीका त्यांनी पवार यांचे नाव न घेता केली. राज्यातील भाजप- सेना सरकारमध्ये कुठलाही वाद नाही. हे वाद केवळ माध्यमांमध्ये पाहण्यास मिळत असल्याचेही ते म्हणाले.

देशात महागाई वाढली याचा आम्ही स्विकार करतो; परंतु, देशातील ९० कोटी गरीब लोकांना सरकार मोफत रेशन देत आहे. ‘किसान सन्मान योजने’तून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ब्रिजभूषण सिंह यांची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण होऊ द्या. चौकशीनंतर जी कारवाई होणार ती होणारच आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणे योग्य राहणार नसल्याचे मौर्य यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाRam Mandirराम मंदिरArticle 370कलम 370Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना