शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कौतुकास्पद कामगिरी! महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा पंतप्रधान बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:21 IST

प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहूनाम पटकावला

पुणे : प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान पटकावला. या सोबतच मुंबईची पृथ्वी पाटील हीने देशभरातून अव्वल येत मानाचा गॉड ऑफ ऑनरचा मान पटकावत देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरली. तर पुण्याचा शंतनु मिसाळ हा देशभरातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडीअर आर. के. गायकवाड यांनी दिली. 

प्रजासत्ताक दिन संचलन शिबीराच्या निमित्ताने प्रतिष्ठेचा पंतप्रधान बॅनर पटकावण्याचा मान यंदा महाराष्ट्राला मिळाला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. यावर्षी राज्यभरातून जवळपास ५७ कॅडेट्सची निवड प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी करण्यात आली होती. अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर राज्यातील १८ कॅडेट्सना राजपथावर संचलन करण्याचा मान मिळाला. यात सिनीअर डीव्हीजनच्या १० मुले आणि ८ मुलींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा आणि मेजर आरूष शेटे यांनी मार्गर्शन केले. महाराष्ट्राच्या पथकाने  २००२ ते २०१४ दरम्यान सलग सहा वेळा विजेते पद मिळवले होते. यानंतर २०२०, २०२१ मध्ये महाराष्ट्राकडे उपविजेतेपद आले होते आणि आता पुन्हा विजेतेपदाचा मान राज्याच्या एनसीसी कॅडेट्सनी मिळवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड 

शिबिरासाठी यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड झाली होती. ५७ मध्ये एकूण १३ छात्रसैनिक मुंबईतील आहेत. १३ मध्ये दहा छात्रसैनिक मुंबई ‘ब’ तर तीन छात्रसैनिक मुंबई ‘अ’ गटातील आहेत. या १३ मध्ये १० छात्रसैनिक मुले तर तीन मुली आहेत. मुंबईत एनसीसीचे दोन गट असून त्यामध्ये २१ युनिट्स आहेत. शिबिरात निवड झालेले १३ छात्रसैनिक या २१ युनिट्समधील आहेत.

''प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संरक्षण दलांच्या संचलन तुकड्यांसह एनसीसीची तुकडीही सहभागी होत असते. या तुकडीतील छात्रांची निवड विशेष शिबिरातून होत असते. हे शिबीर अत्यंत खडतर असते. त्यामुळेच एकूण शिबीरार्थींपैकी जेमतेम पाच ते सात टक्के छात्रांची निवड प्रत्यक्ष संचलनासाठी होते. या विद्यार्थ्यांना पुण्यातील शिबिरात अत्यंत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या सोबतच विद्यार्थ्यांनीही मनापासून आणि शिस्तीचे दर्शन घडवत हे यश मिळवले आहे असे ब्रिगेडीअर आर. के.गायकवाड (एनसीसी प्रमुख, पुणे विभाग) यांनी सांगितले.''

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीForceफोर्स