शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

गुणवत्ता नाही म्हणून समायोजन; शाळा बंदचे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अजब कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:23 IST

तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले.

ठळक मुद्देया मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे नाही शक्य, रस्तादेखील खराबआम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले : राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी 

पुणे : तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. या वेळी शिक्षिका व केंद्रप्रमुख कृष्णा हेळकर हेदेखील उपस्थित होते. शाळा बंद करण्याचे हे अजब कारण पाहून येथील पालकांत व नागरिकांमध्ये  मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही तर मग इतकी वर्ष आपले शिक्षक या शाळेवर दररोज येऊन नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकी वर्ष येथे शिकवणाऱ्या शिक्षिकेला दिला गेलेला पगारदेखील वायाच गेला. तोदेखील शासनाने वसूल करून शासन जमा करावा. अशी संतप्त प्रतिक्रिया पालक शंकर नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याचबरोबर आमची मुलं मंदच आहेत आणि मला व माझा पत्नीला दररोज मोलमजुरी करूनच पोट भरावे लागते. त्यामुळे मी माझ्या मुलीला रोज माळेवाडीला शाळेत सोडायला किंवा आणायला जाऊ शकत नाही. शाळा माळेवाडी येथे समायोजित केली तशी आमच्या मुलांची नेण्याची व आण्याची सोय करावी. आणि काय आमची मुलं माळेवाडी येथे गेल्यावर हुशार होतील, याची लेखी हमीदेखील गटशिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी. तरच आमची मुलं माळेवाडी येथे पाठवायला काही हरकत नाही. असे मत पालक शंकर नगरे यांनी व्यक्त केले.  तरी या वेळी सोमनाथ शिंदे, स्वप्निल काळे, रामदास इंजे, शिवाजी भोई, सुनील नगरे, मल्लापा नाटेकर, शंकर नगरे, विकी जावळे, महादेव इंजे, चंद्रकांत जावळे तरी लवकरात लवकर ही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाºया शिक्षकेची चौकशी  करावी, अशी मागणी करत आहेत

विद्यार्थ्यांची साडेतीन किमीची पायपीटशेलारपट्टा येथील शाळा माळेवाडी येथील शाळेत कागदोपत्री समायोजन केले, तरी या मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे शक्य नाही. शिवाय, येथील जायचा रस्तादेखील खूप खराब आहे.शिवाय पावसाळ्यात तर अक्षरश: जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तर विचारच करायला नको.

विद्यार्थ्यांची गुणवता कमी असण्यापाठीमागे शिक्षकांचा नाकर्तेपणा आहे. उलट विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याबद्दल शाळा बंद न करता त्या शिक्षकांवर कारवाई करावी.

- बाळासाहेब काळे, पंचायत समिती सदस्य

आम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले आहे.    - राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी  

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे