शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता नाही म्हणून समायोजन; शाळा बंदचे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अजब कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:23 IST

तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले.

ठळक मुद्देया मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे नाही शक्य, रस्तादेखील खराबआम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले : राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी 

पुणे : तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. या वेळी शिक्षिका व केंद्रप्रमुख कृष्णा हेळकर हेदेखील उपस्थित होते. शाळा बंद करण्याचे हे अजब कारण पाहून येथील पालकांत व नागरिकांमध्ये  मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही तर मग इतकी वर्ष आपले शिक्षक या शाळेवर दररोज येऊन नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकी वर्ष येथे शिकवणाऱ्या शिक्षिकेला दिला गेलेला पगारदेखील वायाच गेला. तोदेखील शासनाने वसूल करून शासन जमा करावा. अशी संतप्त प्रतिक्रिया पालक शंकर नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याचबरोबर आमची मुलं मंदच आहेत आणि मला व माझा पत्नीला दररोज मोलमजुरी करूनच पोट भरावे लागते. त्यामुळे मी माझ्या मुलीला रोज माळेवाडीला शाळेत सोडायला किंवा आणायला जाऊ शकत नाही. शाळा माळेवाडी येथे समायोजित केली तशी आमच्या मुलांची नेण्याची व आण्याची सोय करावी. आणि काय आमची मुलं माळेवाडी येथे गेल्यावर हुशार होतील, याची लेखी हमीदेखील गटशिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी. तरच आमची मुलं माळेवाडी येथे पाठवायला काही हरकत नाही. असे मत पालक शंकर नगरे यांनी व्यक्त केले.  तरी या वेळी सोमनाथ शिंदे, स्वप्निल काळे, रामदास इंजे, शिवाजी भोई, सुनील नगरे, मल्लापा नाटेकर, शंकर नगरे, विकी जावळे, महादेव इंजे, चंद्रकांत जावळे तरी लवकरात लवकर ही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाºया शिक्षकेची चौकशी  करावी, अशी मागणी करत आहेत

विद्यार्थ्यांची साडेतीन किमीची पायपीटशेलारपट्टा येथील शाळा माळेवाडी येथील शाळेत कागदोपत्री समायोजन केले, तरी या मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे शक्य नाही. शिवाय, येथील जायचा रस्तादेखील खूप खराब आहे.शिवाय पावसाळ्यात तर अक्षरश: जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तर विचारच करायला नको.

विद्यार्थ्यांची गुणवता कमी असण्यापाठीमागे शिक्षकांचा नाकर्तेपणा आहे. उलट विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याबद्दल शाळा बंद न करता त्या शिक्षकांवर कारवाई करावी.

- बाळासाहेब काळे, पंचायत समिती सदस्य

आम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले आहे.    - राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी  

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे