शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अदानी समूह करणार मदत; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:04 IST

विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी हा पर्याय समोर येऊ शकतो, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला....

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अदानी समूह रक्कम देणार असल्याचे स्पष्ट संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी हा पर्याय समोर येऊ शकतो, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “विमानतळाच्या जागेसाठी भूसंपादन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण करणार की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार यावर चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी लागणारी पाच हजार कोटींची रक्कम उपलब्ध करून देणे सरकारला शक्य नाही. ही रक्कम अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव दिला आहे. राज्य सरकार त्या निधीतून भूसंपादन करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. ते परत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल. येत्या दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लागलेला असेल.’’

राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया व संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखविला. त्याचवेळी भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र भूसंपादन झाले नव्हते. त्यानंतर निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेचा प्रस्ताव पुढे आला होता.

केंद्र सरकारकडून विमानतळाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न पुन्हा रखडला. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पूर्वी निश्चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी विमानतळाची गरज बोलून दाखविली, तर जेजुरी येथील कार्यक्रमात फडणवीस यांनी विमानतळासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे विमानतळाचे काम अखेर मार्गी लागणार, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतAdaniअदानीPuneपुणे