शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अदानी समूह करणार मदत; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:04 IST

विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी हा पर्याय समोर येऊ शकतो, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला....

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अदानी समूह रक्कम देणार असल्याचे स्पष्ट संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी हा पर्याय समोर येऊ शकतो, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “विमानतळाच्या जागेसाठी भूसंपादन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण करणार की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार यावर चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी लागणारी पाच हजार कोटींची रक्कम उपलब्ध करून देणे सरकारला शक्य नाही. ही रक्कम अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव दिला आहे. राज्य सरकार त्या निधीतून भूसंपादन करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. ते परत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल. येत्या दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लागलेला असेल.’’

राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया व संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखविला. त्याचवेळी भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र भूसंपादन झाले नव्हते. त्यानंतर निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेचा प्रस्ताव पुढे आला होता.

केंद्र सरकारकडून विमानतळाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न पुन्हा रखडला. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पूर्वी निश्चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी विमानतळाची गरज बोलून दाखविली, तर जेजुरी येथील कार्यक्रमात फडणवीस यांनी विमानतळासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे विमानतळाचे काम अखेर मार्गी लागणार, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतAdaniअदानीPuneपुणे