शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

शेतीला पाणी न देणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : जलसंपदाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:22 IST

यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही

ठळक मुद्दे जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशची अंमलबजावणी व्हावी

पुणे : महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत न केल्यामुळे जलसंपत्ती नियामन प्राधिकरण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बारामतीमधील शेतकऱ्याने जलसंपदा विभागाकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी ही तक्रार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाला महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत केलेली नाही. मुठा कालवे यांनीही महापालिकेला पाणी नियंत्रण करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने देखील पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यास महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे लेखी उत्तर खडकवासला पाटबंधारे विभागाने तक्रारदार जराड यांना दिले आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने महापालिकेस ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पुर्वी खरीप, रब्बी आणि उन्हाळी आवर्तन दिली जात होती. यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे जराड यांनी जलसंपदा विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका