शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतीला पाणी न देणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : जलसंपदाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:22 IST

यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही

ठळक मुद्दे जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशची अंमलबजावणी व्हावी

पुणे : महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत न केल्यामुळे जलसंपत्ती नियामन प्राधिकरण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बारामतीमधील शेतकऱ्याने जलसंपदा विभागाकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी ही तक्रार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाला महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत केलेली नाही. मुठा कालवे यांनीही महापालिकेला पाणी नियंत्रण करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने देखील पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यास महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे लेखी उत्तर खडकवासला पाटबंधारे विभागाने तक्रारदार जराड यांना दिले आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने महापालिकेस ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पुर्वी खरीप, रब्बी आणि उन्हाळी आवर्तन दिली जात होती. यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे जराड यांनी जलसंपदा विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका