शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

गावे समाविष्ट करण्याआधी पीएमआरडीएचा विकास आराखडा स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ...

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करत आहे. हा आरखडा अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुळे गावे महानगरपालिकेने समाविष्ट करण्याआधी हा विकास आरखडा मंजूर करावा, अशी मागणी सूस ग्रामपंचायतीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेत २३ गावांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ज्या गावांना याबाबत आक्षेप असेल त्यांना २३ तारखेपर्यंत सूचना व हरकती सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सूस ग्रामपंचायतीने उपसरपंच दिशा ससार यांनी त्यांच्या हरकती विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या आहेत. महानगरपालिकेत जाण्यापूर्वी पीएमआरडीएने तयार केलेला विकास आरखडा पालिकेने मंजूर करावा. त्यानंतर गावे समाविष्ट करावी. हा आरखडा अंतिम होईपर्यंत करवसुली ही ग्रामपंचायतीप्रमाणेच सुरू ठेवावी किंवा

ग्रामपंचायत कराच्या २० टक्के दरवर्षी वाढ करून पाचव्या वर्षी शंभर टक्के करावी. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने पुणे मनपास द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१९९७ मध्ये काही गावे पालिकेत समाविष्ट करताना पुणे प्रादेशिक योजनेमध्ये शासनाने गावामध्ये जमीन वापर बदल (झोनिंग – शेती व ना विकास विभागातून निवासी विभागामध्ये रुपांतर) करून ती पालिकेत समाविष्ट केली होती. त्याप्रमाणे आताही पीएमआरडीएने प्रादेशिक योजनेप्रमाणे गावातील जमिनीचे निवासी विभागामध्ये बदल करून ती पालिकेत समाविष्ट करावीत.

सूस गावाच्या बाजूला असलेल्या हिंजेवाडीचा भाग झपाट्याने विकसित होत असून नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. अशा वेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे मोठे रस्ते व सुनियोजित विकास करण्याकरिता नवीन महानगरपालिकेची अत्यंत आवश्यकता आहे. शासनस्तरावर याविषयी गांभीर्याने विचार व्हावा, असेही ससार म्हणाल्या.

चौकट

२०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील करआकारणी करताना लगतच्या मनापामधील मिळकतींचे मूल्यांकनाचे निकष लावून करआकारणी करण्यात आली. त्यामुळे अवास्तव करआकारणी या समाविष्ट ११ गावांमध्ये झाली. या गावांमध्ये अद्यापपर्यंत पायाभूत सोयीसुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या गावांचा विकास आराखडा नियोजन अजून झाले नाही. हा जो विस्कळीतपणा २३ गावांच्या बाबतीत प्रशासनाने करू नये.

कोट

२३ गावे समाविष्ट करताना या गावांत पायाभूत सोयीसुविधा किती कालावधीत उपलब्ध करून देणार? करआकारणी टप्प्याटप्प्याने करणार आहे का ? विकास आराखडा किती कालावधी मध्ये करणार? याचा कालबद्ध कार्यक्रम आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा व त्या कालावधीत अंमलबजावणी न झाल्यास गावे मनापा हद्दीमधून वगळण्याचा पर्याय उपलब्ध असावा तसेच प्रशासनाने आम्हाला याबाबत लेखी स्वरूपात द्यावे.

- दिशा ससार, उपसरपंच सूस.