शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

कोट्यवधींचा खर्च तरीही आदिवासींना मिळेना बळ

By admin | Updated: August 9, 2016 01:52 IST

आदिवासी विकास विभागाच्या निधीचा मोठा भाग शिक्षणासाठी म्हणजे पर्यायाने आश्रमशाळांसाठी खर्च होत आहे. मात्र, आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे

प्राची मानकर , पुणेआदिवासी विकास विभागाच्या निधीचा मोठा भाग शिक्षणासाठी म्हणजे पर्यायाने आश्रमशाळांसाठी खर्च होत आहे. मात्र, आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे आहे. पाच लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७२ टक्के विद्यार्थी दहावीपर्यंत शाळा सोडून देतात. केवळ ३ टक्के विद्यार्थीच पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचू शकतात, असे दिसून आले आहे. आदिवासी विकास विभागासाठी राज्य शासनाचे पाच हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यापैकी १७०० कोटी रुपये शिक्षणासाठी खर्च होतात. राज्यातील ११०० आश्रमशाळांमध्ये पाच लाख विद्यार्थी दर वर्षी प्रवेश घेतात. मात्र, या आश्रमशाळांमध्ये शास्त्र, गणित, इंग्रजीसारख्या विषयांना तज्ज्ञ शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवडच निर्माण होत नाही. शिवाय परिस्थितीमुळे दहावीनंतर अनेक जणांना रोजगाराकडे वळावे लागते. त्यामुळे गळतीचे प्रमाण मोठे आहे. आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र तळपे म्हणाले, ‘‘ खऱ्या आदिवासींना फायदा मिळत नाही, हे अनेकदा दिसून येते. दहावीनंतर केवळ ५५ हजार विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी येतात. यामध्येही शिक्षक, शासकीय कर्मचारी यांची मुले असतात. आदिवासी पट्ट्यात राहणारे त्याच अवस्थेत जगत असतात. केवळ शिक्षणच नव्हे तर आरोग्याच्या बाबतही आदिवासी समाजाला पुरेशा सुविधा नाहीत. आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये काम करण्यास सर्जन, बालरोगतज्ज्ञ तयार होत नाही. गरोदर मातांचे पोषण होत नाही. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर निधी केवळ मंजूर होतो. परंतु, त्याचा योग्य विनियोग होत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून इतके वर्ष झाली तरी आदिवासी पाड्यापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य आदिवासी पाड्यापर्यंत प्रथम प्राथमिक शिक्षण पोहोचायला हवे त्यासाठी आदिवासी शिक्षण आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे.