शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा खर्च तरीही आदिवासींना मिळेना बळ

By admin | Updated: August 9, 2016 01:52 IST

आदिवासी विकास विभागाच्या निधीचा मोठा भाग शिक्षणासाठी म्हणजे पर्यायाने आश्रमशाळांसाठी खर्च होत आहे. मात्र, आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे

प्राची मानकर , पुणेआदिवासी विकास विभागाच्या निधीचा मोठा भाग शिक्षणासाठी म्हणजे पर्यायाने आश्रमशाळांसाठी खर्च होत आहे. मात्र, आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे आहे. पाच लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७२ टक्के विद्यार्थी दहावीपर्यंत शाळा सोडून देतात. केवळ ३ टक्के विद्यार्थीच पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचू शकतात, असे दिसून आले आहे. आदिवासी विकास विभागासाठी राज्य शासनाचे पाच हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यापैकी १७०० कोटी रुपये शिक्षणासाठी खर्च होतात. राज्यातील ११०० आश्रमशाळांमध्ये पाच लाख विद्यार्थी दर वर्षी प्रवेश घेतात. मात्र, या आश्रमशाळांमध्ये शास्त्र, गणित, इंग्रजीसारख्या विषयांना तज्ज्ञ शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवडच निर्माण होत नाही. शिवाय परिस्थितीमुळे दहावीनंतर अनेक जणांना रोजगाराकडे वळावे लागते. त्यामुळे गळतीचे प्रमाण मोठे आहे. आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र तळपे म्हणाले, ‘‘ खऱ्या आदिवासींना फायदा मिळत नाही, हे अनेकदा दिसून येते. दहावीनंतर केवळ ५५ हजार विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी येतात. यामध्येही शिक्षक, शासकीय कर्मचारी यांची मुले असतात. आदिवासी पट्ट्यात राहणारे त्याच अवस्थेत जगत असतात. केवळ शिक्षणच नव्हे तर आरोग्याच्या बाबतही आदिवासी समाजाला पुरेशा सुविधा नाहीत. आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये काम करण्यास सर्जन, बालरोगतज्ज्ञ तयार होत नाही. गरोदर मातांचे पोषण होत नाही. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर निधी केवळ मंजूर होतो. परंतु, त्याचा योग्य विनियोग होत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून इतके वर्ष झाली तरी आदिवासी पाड्यापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य आदिवासी पाड्यापर्यंत प्रथम प्राथमिक शिक्षण पोहोचायला हवे त्यासाठी आदिवासी शिक्षण आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे.