शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:25 IST

मोदींच्या नेतृत्वात भारत जगात विश्वसनीयतेचा ब्रॅंड नक्की होणार, मला आता विश्वास आला

मनोज पोचट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर भाषणात माझे नाव घेतले, त्यावेळी मी तिथेच होतो. ऐकले त्याचक्षणी मी आश्चर्य व आनंद अशा दोन भावनांच्या अत्युच्च शिखरावर गेलो. एका साधे ट्वीट केले होते; पण पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ते पाहावे, त्याविषयी माझे नाव घेऊन बोलावे, अपेक्षा व्यक्त करावी हे सगळेच माझ्यासाठी विलक्षण अनुभव देणारे होते.

मी उद्योग क्षेत्रात काम करतो, माझी स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे देश, देशाची संस्कृती व एकूणच समाज, त्याची प्रगती याबद्दल माझे म्हणून काही विचार आहेत. माझे काम करताना मी त्याचा अवलंब करतोच; पण देश म्हणून विचार करताना सरकारकडूनही असे काही व्हावे, अशी माझी अपेक्षा असते. देशातील नेत्यांचे विचार, त्यांची भाषणे, सरकारचे कामकाज या सगळ्याचा मी देशाचा नागरिक म्हणून नेहमी त्याच दृष्टिकोनातून विचार करतो.

सन २०१३ च्या जुलै महिन्यात नरेंद्र मोदी फर्ग्यूसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आले होते. मी त्याही वेळी तिथे होतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय नुकतेच फिरू लागले होते. या संवादाच्या कार्यक्रमाला येण्याआधी मोदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ती माझ्या वाचनात आली होती. त्यात त्यांनी देशाच्या विश्वासाचा पाया खचला असल्याचे किंवा देशात विश्वासाची तूट असल्याचे वक्तव्य केले होते व ती वाढवण्यासाठी काय करता येईल यावर युवा वर्गाला सूचना करण्याचे आवाहन केले होते. मी काही सूचना केल्या होत्या.

तब्बल १० वर्षांनंतर मोदी पुण्यात येणार असल्याचे समजल्यावर मला साहजिकच त्यांच्या त्या पोस्टची व मी त्यावेळी केलेल्या सूचनांची आठवण झाली. दरम्यानच्या काळात मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. मागील नऊ वर्षांत त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले काम निश्चितच फार मोठे आहे. त्यांनी युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, उद्योजकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत अनेक योजना जाहीर केल्या. त्या सर्व योजनांचे नाते भारतीय संस्कृतीबरोबर आहे, असे माझे मत आहे. उज्ज्वला गॅस असेल, जनधन असेल, शेतकरी विमा असेल, कोणतीही योजना घ्या, त्यात भारतीय संस्कृतीचा विचार केलेला दिसतो.

त्यामुळेच या योजनांना प्रतिसादही फार मोठा मिळतो, असे मला वाटते. मोदी पुण्यात येणार आहे, असे समजल्यानंतर मी ३१ जुलैला मला वाटणाऱ्या या सर्व गोष्टींविषयी एक ट्वीट केले. त्यात देशाच्या विश्वसनीयतेत आढळलेली तूट भरून येत असल्याचे मत व्यक्त केले होते. मला कल्पना नव्हती की मोदी या ट्वीटची दखल घेतील; पण त्यांनी ती घेतली. इतकेच नव्हे तर माझ्या नावासह माझ्या मताचाही उल्लेख करत देशाच्या विश्वसनीयतेची तूट भरूनच निघाली नाही तर त्यात वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात जगामध्ये देशाच्या विश्वसनीयतेचा ब्रॅंड व्हावा, अशी माझी आता इच्छा आहे. मोदी यांच्या नेतृत्वात तसे नक्की होईल, असा मला आता विश्वास आला आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतTwitterट्विटर