शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:25 IST

मोदींच्या नेतृत्वात भारत जगात विश्वसनीयतेचा ब्रॅंड नक्की होणार, मला आता विश्वास आला

मनोज पोचट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर भाषणात माझे नाव घेतले, त्यावेळी मी तिथेच होतो. ऐकले त्याचक्षणी मी आश्चर्य व आनंद अशा दोन भावनांच्या अत्युच्च शिखरावर गेलो. एका साधे ट्वीट केले होते; पण पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ते पाहावे, त्याविषयी माझे नाव घेऊन बोलावे, अपेक्षा व्यक्त करावी हे सगळेच माझ्यासाठी विलक्षण अनुभव देणारे होते.

मी उद्योग क्षेत्रात काम करतो, माझी स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे देश, देशाची संस्कृती व एकूणच समाज, त्याची प्रगती याबद्दल माझे म्हणून काही विचार आहेत. माझे काम करताना मी त्याचा अवलंब करतोच; पण देश म्हणून विचार करताना सरकारकडूनही असे काही व्हावे, अशी माझी अपेक्षा असते. देशातील नेत्यांचे विचार, त्यांची भाषणे, सरकारचे कामकाज या सगळ्याचा मी देशाचा नागरिक म्हणून नेहमी त्याच दृष्टिकोनातून विचार करतो.

सन २०१३ च्या जुलै महिन्यात नरेंद्र मोदी फर्ग्यूसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आले होते. मी त्याही वेळी तिथे होतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय नुकतेच फिरू लागले होते. या संवादाच्या कार्यक्रमाला येण्याआधी मोदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ती माझ्या वाचनात आली होती. त्यात त्यांनी देशाच्या विश्वासाचा पाया खचला असल्याचे किंवा देशात विश्वासाची तूट असल्याचे वक्तव्य केले होते व ती वाढवण्यासाठी काय करता येईल यावर युवा वर्गाला सूचना करण्याचे आवाहन केले होते. मी काही सूचना केल्या होत्या.

तब्बल १० वर्षांनंतर मोदी पुण्यात येणार असल्याचे समजल्यावर मला साहजिकच त्यांच्या त्या पोस्टची व मी त्यावेळी केलेल्या सूचनांची आठवण झाली. दरम्यानच्या काळात मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. मागील नऊ वर्षांत त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले काम निश्चितच फार मोठे आहे. त्यांनी युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, उद्योजकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत अनेक योजना जाहीर केल्या. त्या सर्व योजनांचे नाते भारतीय संस्कृतीबरोबर आहे, असे माझे मत आहे. उज्ज्वला गॅस असेल, जनधन असेल, शेतकरी विमा असेल, कोणतीही योजना घ्या, त्यात भारतीय संस्कृतीचा विचार केलेला दिसतो.

त्यामुळेच या योजनांना प्रतिसादही फार मोठा मिळतो, असे मला वाटते. मोदी पुण्यात येणार आहे, असे समजल्यानंतर मी ३१ जुलैला मला वाटणाऱ्या या सर्व गोष्टींविषयी एक ट्वीट केले. त्यात देशाच्या विश्वसनीयतेत आढळलेली तूट भरून येत असल्याचे मत व्यक्त केले होते. मला कल्पना नव्हती की मोदी या ट्वीटची दखल घेतील; पण त्यांनी ती घेतली. इतकेच नव्हे तर माझ्या नावासह माझ्या मताचाही उल्लेख करत देशाच्या विश्वसनीयतेची तूट भरूनच निघाली नाही तर त्यात वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात जगामध्ये देशाच्या विश्वसनीयतेचा ब्रॅंड व्हावा, अशी माझी आता इच्छा आहे. मोदी यांच्या नेतृत्वात तसे नक्की होईल, असा मला आता विश्वास आला आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतTwitterट्विटर