शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:25 IST

मोदींच्या नेतृत्वात भारत जगात विश्वसनीयतेचा ब्रॅंड नक्की होणार, मला आता विश्वास आला

मनोज पोचट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर भाषणात माझे नाव घेतले, त्यावेळी मी तिथेच होतो. ऐकले त्याचक्षणी मी आश्चर्य व आनंद अशा दोन भावनांच्या अत्युच्च शिखरावर गेलो. एका साधे ट्वीट केले होते; पण पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ते पाहावे, त्याविषयी माझे नाव घेऊन बोलावे, अपेक्षा व्यक्त करावी हे सगळेच माझ्यासाठी विलक्षण अनुभव देणारे होते.

मी उद्योग क्षेत्रात काम करतो, माझी स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे देश, देशाची संस्कृती व एकूणच समाज, त्याची प्रगती याबद्दल माझे म्हणून काही विचार आहेत. माझे काम करताना मी त्याचा अवलंब करतोच; पण देश म्हणून विचार करताना सरकारकडूनही असे काही व्हावे, अशी माझी अपेक्षा असते. देशातील नेत्यांचे विचार, त्यांची भाषणे, सरकारचे कामकाज या सगळ्याचा मी देशाचा नागरिक म्हणून नेहमी त्याच दृष्टिकोनातून विचार करतो.

सन २०१३ च्या जुलै महिन्यात नरेंद्र मोदी फर्ग्यूसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून आले होते. मी त्याही वेळी तिथे होतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय नुकतेच फिरू लागले होते. या संवादाच्या कार्यक्रमाला येण्याआधी मोदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ती माझ्या वाचनात आली होती. त्यात त्यांनी देशाच्या विश्वासाचा पाया खचला असल्याचे किंवा देशात विश्वासाची तूट असल्याचे वक्तव्य केले होते व ती वाढवण्यासाठी काय करता येईल यावर युवा वर्गाला सूचना करण्याचे आवाहन केले होते. मी काही सूचना केल्या होत्या.

तब्बल १० वर्षांनंतर मोदी पुण्यात येणार असल्याचे समजल्यावर मला साहजिकच त्यांच्या त्या पोस्टची व मी त्यावेळी केलेल्या सूचनांची आठवण झाली. दरम्यानच्या काळात मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. मागील नऊ वर्षांत त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले काम निश्चितच फार मोठे आहे. त्यांनी युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, उद्योजकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत अनेक योजना जाहीर केल्या. त्या सर्व योजनांचे नाते भारतीय संस्कृतीबरोबर आहे, असे माझे मत आहे. उज्ज्वला गॅस असेल, जनधन असेल, शेतकरी विमा असेल, कोणतीही योजना घ्या, त्यात भारतीय संस्कृतीचा विचार केलेला दिसतो.

त्यामुळेच या योजनांना प्रतिसादही फार मोठा मिळतो, असे मला वाटते. मोदी पुण्यात येणार आहे, असे समजल्यानंतर मी ३१ जुलैला मला वाटणाऱ्या या सर्व गोष्टींविषयी एक ट्वीट केले. त्यात देशाच्या विश्वसनीयतेत आढळलेली तूट भरून येत असल्याचे मत व्यक्त केले होते. मला कल्पना नव्हती की मोदी या ट्वीटची दखल घेतील; पण त्यांनी ती घेतली. इतकेच नव्हे तर माझ्या नावासह माझ्या मताचाही उल्लेख करत देशाच्या विश्वसनीयतेची तूट भरूनच निघाली नाही तर त्यात वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात जगामध्ये देशाच्या विश्वसनीयतेचा ब्रॅंड व्हावा, अशी माझी आता इच्छा आहे. मोदी यांच्या नेतृत्वात तसे नक्की होईल, असा मला आता विश्वास आला आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतTwitterट्विटर