शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:10 IST

नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल

धायरी : नवले पूल परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघाताने पुणे शहर हादरले असताना, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारने जाहीर केलेल्या ५ लाख रुपयांच्या तुटपुंज्या मदतीमुळे संतप्त नातेवाइकांनी सरकारवर कडक आणि जहाल शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाच लाख रुपये एका माणसाची किंमत आहे का? लाज वाटली पाहिजे सरकारला, अशा जहाल शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जाण्याची भयाण परंपरा कायम असताना, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना केवळ ५ लाख रुपयांची मदत जाहीर करणे, म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संतप्त नातेवाइकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, या रकमेवर अत्यंत संताप व्यक्त केला आहे.

एका माणसाच्या आयुष्याची किंमत सरकारने फक्त ५ लाख रुपये लावली आहे का? हा निव्वळ अपमान आहे! सरकारला याची लाज वाटली पाहिजे. आमच्या घरातील व्यक्तीचा जीव गेला आहे, त्याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही. पण, ५ लाख रुपये देऊन सरकारने आमच्या दुःखाची आणि माणुसकीची निव्वळ थट्टा केली आहे, असे संतप्त उद्गार एका नातेवाइकाने काढले.

या अपघातासाठी प्रशासनाची उदासीनता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिरंगाई आणि केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचे सरकारी धोरणच जबाबदार असल्याचा थेट आरोप नातेवाइकांनी केला आहे. नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? हा संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल आहे.

आणखी कोणाचा बळी जायला नको

आणखी कोणाच्या घरातील व्यक्तींचा बळी जायला नको, अशी कळकळीची मागणी करत, संतप्त नातेवाइकांनी सरकारला खडसावले आहे. त्यांना तात्कालिक मदत नको आहे, तर भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत. दोषी अधिकारी आणि एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा. सरकारने केवळ तोंडी दुःख व्यक्त करून आणि तुटपुंजी मदत जाहीर करून आपले कर्तव्य संपले असे समजू नये. पीडितांच्या संतापाला गांभीर्याने घेऊन ठोस उपाययोजना करणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Accident: Kin Condemn ₹5 Lakh Compensation, Demand Accountability

Web Summary : Relatives of Navale bridge accident victims strongly criticized the government's ₹5 lakh compensation, deeming it insufficient and insulting. They demanded accountability for negligence and permanent solutions to prevent future tragedies, accusing authorities of devaluing human life.
टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhighwayमहामार्गAjit Pawarअजित पवार