शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:10 IST

नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल

धायरी : नवले पूल परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघाताने पुणे शहर हादरले असताना, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारने जाहीर केलेल्या ५ लाख रुपयांच्या तुटपुंज्या मदतीमुळे संतप्त नातेवाइकांनी सरकारवर कडक आणि जहाल शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाच लाख रुपये एका माणसाची किंमत आहे का? लाज वाटली पाहिजे सरकारला, अशा जहाल शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जाण्याची भयाण परंपरा कायम असताना, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना केवळ ५ लाख रुपयांची मदत जाहीर करणे, म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संतप्त नातेवाइकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, या रकमेवर अत्यंत संताप व्यक्त केला आहे.

एका माणसाच्या आयुष्याची किंमत सरकारने फक्त ५ लाख रुपये लावली आहे का? हा निव्वळ अपमान आहे! सरकारला याची लाज वाटली पाहिजे. आमच्या घरातील व्यक्तीचा जीव गेला आहे, त्याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही. पण, ५ लाख रुपये देऊन सरकारने आमच्या दुःखाची आणि माणुसकीची निव्वळ थट्टा केली आहे, असे संतप्त उद्गार एका नातेवाइकाने काढले.

या अपघातासाठी प्रशासनाची उदासीनता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिरंगाई आणि केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचे सरकारी धोरणच जबाबदार असल्याचा थेट आरोप नातेवाइकांनी केला आहे. नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? हा संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल आहे.

आणखी कोणाचा बळी जायला नको

आणखी कोणाच्या घरातील व्यक्तींचा बळी जायला नको, अशी कळकळीची मागणी करत, संतप्त नातेवाइकांनी सरकारला खडसावले आहे. त्यांना तात्कालिक मदत नको आहे, तर भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत. दोषी अधिकारी आणि एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा. सरकारने केवळ तोंडी दुःख व्यक्त करून आणि तुटपुंजी मदत जाहीर करून आपले कर्तव्य संपले असे समजू नये. पीडितांच्या संतापाला गांभीर्याने घेऊन ठोस उपाययोजना करणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Accident: Kin Condemn ₹5 Lakh Compensation, Demand Accountability

Web Summary : Relatives of Navale bridge accident victims strongly criticized the government's ₹5 lakh compensation, deeming it insufficient and insulting. They demanded accountability for negligence and permanent solutions to prevent future tragedies, accusing authorities of devaluing human life.
टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhighwayमहामार्गAjit Pawarअजित पवार