शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकरी लग्नसोहळ्याला गेला अन् इकडे 40 एकर ऊस जळून खाक झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 22:02 IST

शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे सुमारे ४० एकर ऊसाला अचानक आग ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आग कशामुळे लागली कारण मात्र समजू शकले नाहीत. याबाबत  माहितीनुसार, रविवारी (दि. ६) दुपारी 12 ते 1 वाजताच्या आसपास गणेगाव दुमाला येथील अविनाश शितोळे गट नंबर 545 यांच्या उसाच्या शेताला आग लागली. शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

दुपारच्या उन्हात आगीने रुद्र रूप धारण केल्याने परिसरातील दत्तात्रय शितोळे, रामराव गरुड, मानसिंग शितोळे, अमरसिंग शितोळे, दिलीप शितोळे पोपट गरुड, कोंडीबा गरुड, संतोष गरुड, किसन गरुड, अरुण गरुड, दीपक गरुड, ज्ञानदेव सांगळे, चंद्रकांत कुदळे, महादेव कुदळे, नाना कुदळे या शेतकऱ्यांच्या एकूण ४० एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक आग लागल्यामुळे नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. परंतु वाऱ्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असलेने आग पसरत गेली व ऊस जळाल्याने परिसरातील शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा दौंड शुगर यांनी या भागातील जळीत उसाचे तोडणी करून गाळप करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले असून ऊस तोडणी करून घेऊन जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने