शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 14:41 IST

मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले....

पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड; तसेच पीक व मातीतील आर्द्रतेचे परिणाम प्रमाण या निकषांवर राज्यातील राज्यातील १५ जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र ही मदत देताना सासकट द्यावी की पुन्हा पंचनामे करावेत, याबाबत कृषी व महसूल विभाग संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा पहिला निकष लागू झाला. त्याचप्रमाणे पीक निर्देशांक व जमिनीतील आर्द्रतेचा निर्देशांक या निकषांचा आधार घेत राज्यातील १५ तालुक्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, यासाठी कृषी आयुक्तांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर केलेल्या पडताळणीनंतर कृषी आयुक्तालयाने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली. त्यानुसार राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमधील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात पिकांचे पंचनामे करावेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आता पीक हंगाम संपला आहे. शेतात पिके उभे नाहीत. त्यामुळे पंचनामा कसा करावा, असा प्रश्न राज्यातील सर्व १५ जिल्ह्यांमधील जिल्हा महसूल यंत्रणेला पडला आहे. बागायती क्षेत्रातील पिकांचे पंचनामे कसे करावेत, याबाबतही स्पष्टता नसल्याने हा संभ्रम आणखीनच वाढला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात सरसकट मदत द्यावी, असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मदत कशी द्यावी, याचाही संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी विभागाने पीक कापणी अहवालानंतर काढलेल्या उंबरठा उत्पादनावर ही मदत द्यावी का, याबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडून सल्ला घेतल्यावर कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यातील ६१ हजार २५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख ३१० शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर शिरूर, इंदापूर व दौंड या तालुक्यांमधील ५२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील १ लाख १३ हजार ६८४ शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळ