शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ९१ टक्के पेरण्या पूर्ण, सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घटले, पावसामुळे भात लावण्यांना वेग

By नितीन चौधरी | Updated: July 22, 2024 18:41 IST

मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण

पुणे: राज्यात गेल्या महिन्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेळेत सुरुवात झाली. मात्र, कोकण आणि पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस नसल्याने भात लावण्यांना उशीर झाला होता. सध्या पूर्व विदर्भ आणि कोकणात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख हेक्टर असून आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वाधिक ४८ लाख ५ हजार हेक्टर अर्थात सरासरीच्या ११६ टक्के सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. तर कापूस पिकाची ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा मॉन्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे खरिपातील उडीद, मूग तसेच कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या वेळेत झाल्या. मात्र, कोकण तसेच पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताची लावणी वेळेत होऊ शकली नाही. गेल्या पंधरवड्यापासून या दोन्ही विभागांत होत असलेल्या पावसामुळे भाताची ४२ टक्के लावणी पूर्ण झाली आहे. परिणामी राज्यात एकूण १ कोटी २८ लाख ९४ हजार ४४६ हेक्टर अर्थात ९०.७९ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या पेरण्यांच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे.

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर इतके असून आतापर्यंत ४८ लाख ५ हजार ९९७ अर्थात ११६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, कापूस पिकाच्या सरासरी क्षेत्रात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टरवर कापसाची पेरणी केली जाते. तर आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टर अर्थात ९५ टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ३१ हजार ८८७ हेक्टर अर्थात ४२ टक्क्यांवर लावणी झाली आहे.

बाजरी पिकाची सरासरी ६ लाख ६९ हजार ८९ हेक्टरवर पेरणी होत असते त्या तुलनेत आतापर्यंत ३ लाख ८० हजार ८४३ अर्थात ५७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर सरासरी तूर लागवड १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर असून आतापर्यंत ११ लाख ६ हजार अर्थात ९० टक्के तुरीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मुगाच्या २ लाख २१ हजार ९६१ हेक्टर अर्थात ५६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा उडीदाच्या पेरण्या ९३ टक्के अर्थात ३ लाख ४४ हजार ६९१ हेक्टर झाल्या आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसenvironmentपर्यावरणDamधरण