शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

राज्यात ९१ टक्के पेरण्या पूर्ण, सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घटले, पावसामुळे भात लावण्यांना वेग

By नितीन चौधरी | Updated: July 22, 2024 18:41 IST

मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण

पुणे: राज्यात गेल्या महिन्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेळेत सुरुवात झाली. मात्र, कोकण आणि पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस नसल्याने भात लावण्यांना उशीर झाला होता. सध्या पूर्व विदर्भ आणि कोकणात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख हेक्टर असून आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वाधिक ४८ लाख ५ हजार हेक्टर अर्थात सरासरीच्या ११६ टक्के सोयाबीनच्या पेरण्या झाल्या आहेत. तर कापूस पिकाची ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा मॉन्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे खरिपातील उडीद, मूग तसेच कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या वेळेत झाल्या. मात्र, कोकण तसेच पूर्व विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताची लावणी वेळेत होऊ शकली नाही. गेल्या पंधरवड्यापासून या दोन्ही विभागांत होत असलेल्या पावसामुळे भाताची ४२ टक्के लावणी पूर्ण झाली आहे. परिणामी राज्यात एकूण १ कोटी २८ लाख ९४ हजार ४४६ हेक्टर अर्थात ९०.७९ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या पेरण्यांच्या तुलनेत हे प्रमाण ११३ टक्के इतके आहे.

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर इतके असून आतापर्यंत ४८ लाख ५ हजार ९९७ अर्थात ११६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, कापूस पिकाच्या सरासरी क्षेत्रात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टरवर कापसाची पेरणी केली जाते. तर आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार १२७ हेक्टर अर्थात ९५ टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ३१ हजार ८८७ हेक्टर अर्थात ४२ टक्क्यांवर लावणी झाली आहे.

बाजरी पिकाची सरासरी ६ लाख ६९ हजार ८९ हेक्टरवर पेरणी होत असते त्या तुलनेत आतापर्यंत ३ लाख ८० हजार ८४३ अर्थात ५७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर सरासरी तूर लागवड १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर असून आतापर्यंत ११ लाख ६ हजार अर्थात ९० टक्के तुरीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मुगाच्या २ लाख २१ हजार ९६१ हेक्टर अर्थात ५६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा उडीदाच्या पेरण्या ९३ टक्के अर्थात ३ लाख ४४ हजार ६९१ हेक्टर झाल्या आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसenvironmentपर्यावरणDamधरण