शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:08 IST

दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.

पुणे : आर्मी डे परेडमध्ये बुधवारी शस्त्रे, वाहने असे सर्व काही भारतीय बनावटीचे होते. आज भारतीय लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर होत आहे. संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सैन्य दिनानिमित्त आयोजित करण्यात व्यक्त केले.

बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या संचलन मैदानावर झालेल्या सैन्य दिन कवायतीच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. द्विवेदी म्हणाले, दक्षिण मुख्यालय हे सर्वांत मोठ्या मुख्यालयांपैकी एक आहे. देशातील ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश असा एकूण ४१ टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित येतो. नौदलाची तीन मुख्यालये, हवाई दलाची चार मुख्यालयेही दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आहेत. येत्या काळात दक्षिण मुख्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

नेपाळप्रमाणे अन्य मित्र राष्ट्रांच्या पथकांना निमंत्रित करण्याबाबत लष्करप्रमुख म्हणाले, नेपाळप्रमाणे अन्य मित्र राष्ट्रांना निमंत्रित करायला नक्कीच आवडेल, असे सांगत येत्या काळात आणखी काही लष्करी बँड येऊ शकतील. अधिकाधिक संवादातून गरजेनुसार एकत्र काम करणे सोपे जाते, असे मत व्यक्त केले.

यंदाच्या सैन्य कवायतीत पहिल्यांदाच सेना पोलिसांच्या महिला अग्निवीर आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. याबाबत बोलताना द्विवेदी म्हणाले की, विकसित भारतात नारीशक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तसेच पुढच्या काळात भारतीय लष्करातही महिलांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.

पुढील वर्षी माजी सैनिक, उद्योगांचाही समावेश

पुढील सैन्य दिन कवायतीसाठी गुवाहाटी, जयपूर, भोपाळ, जबलपूर अशी शहरे निवडली जाणार आहेत. लवकरच समिती नियुक्त करून आवश्यक सुविधांची उपलब्धता असलेल्या शहराची सैन्य दिन कवायतीसाठी निवड केली जाईल. पुढील वर्षी माजी सैनिक, संरक्षण उत्पादन करणारे उद्योग यांनाही सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

‘गलवान’ची पुनरावृत्ती नको...भारतीय लष्कर नेहमीच पुरेशा संख्येने तैनात असल्याने देशाची उत्तर सीमा सुरक्षित आहे. मात्र, गलवानमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. - उपेंद्र द्विवेदी, लष्करप्रमुख

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnda puneएनडीए पुणे