शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ

By नितीन चौधरी | Updated: October 2, 2023 18:51 IST

ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत....

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २६ हजार जणांनी नव मतदार म्हणून नोंदणी केली असून राज्यात ती सर्वाधिक आहे. यातील ८४ हजार ४४४ नवमतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्यात ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नवमतदारांची नोंदणी, नाव पत्ता व फोटोतील दुरुस्ती आणि मयतांसह दुबार मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच मतदारांच्या पडताळणीचे कामही सुरू आहे. त्यानंतर ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार, पुणे जिल्ह्यात जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. नवमतदारांसाठी - अर्ज क्रमांक सहा, मयत अथवा दुबारांची नावे वगळण्यासाठी अर्ज क्रमांक सात आणि दुरुस्तीसाठी - अर्ज क्रमांक आठ असे भरण्यात आले होते. ऑनलाईन आलेले अर्ज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना देण्यात येतात. हे अधिकारी मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करतात. त्यात तफावत आढळल्यास अर्ज बाद केला जातो. तर पडताळणी योग्य असल्यास अर्ज स्वीकारला जातो.

त्यानुसार नवमतदारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात १ लाख २६ हजार जणांनी अर्ज केले होते. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यातील ८४ हजार ४४४ नवमतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तसेच १७ हजार ९ अर्ज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना अद्याप सोपविण्यात आलेले नाहीत. तर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी पडताळणी केलेल्या २७ हजार ४९७ अर्जांवर स्वीकृतीची मोहोर २७ ऑक्टोबरनंतर उमटविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात २४ हजार हजार ४४४ मतदारांची नावे दुबार अथवा मयत झाल्याच्या कारणास्तव वगळण्यासाठी तसेच नावात बदल अथवा दुरुस्ती करण्यासंदर्भात ५० हजार ८८८ जणांनी अर्ज केले होते. त्या सर्व अर्जदारांच्या अर्जानुसार मतदारयादीत समावेशन, दुरुस्ती आणि वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.मतदारयादीतील दुबार अथवा मयतांची नावे वगळण्यासाठी २४ हजार ४४४ अर्ज प्राप्त झाले होते.

त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारसंघातील सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत. त्या उलट पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील मतदारसंघात कमी प्रमाणात दुबार अथवा मयतांची नावे वगळण्यासाठी अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील २१ मतदारसंघात सर्वाधिक दुबार अथवा मयतांची इंदापूर मतदासंघातून ३०१७ जणांची नावे वगळली आहेत. त्या पाठोपाठ दौंडमधून, तसेच वडगाव शेरी मतदारसंघातून २१६७ जणांची नावे वगळली आहेत. सर्वाधिक कमी पुरंदर मतदारसंघात ३०१ जणांची, तसेच पुणे कँटोन्मेंटमधील ४८७ मतदारांची नावे वगळली आहेत.

मतदारसंघ .......... नवमतदार.....दुबार/मयत वगळले.....दुरुस्ती.......एकूणवडगाव शेरी...............६८२३.................२१६७.................. ५५०६..........१४,४९६

शिवाजीनगर..............२२६५..................८४१...................१८१९...............४९२५कोथरूड ...................२४६३.................९६३..................२४०३................५८२९

खडकवासला..................४६९३...............७१७..................२२८२.........७६९२पर्वती ..........................२५३५.............९६८..............२११२.............५६१५

हडपसर .....................८१९४...............८२७.............३७४९...........१२७७०पुणे कँटोन्मेंट ................२३२८..........४८७...............११९२.............४००७

कसबा पेठ...........१९९९.................१३२३..........११३२.................४४५४चिंचवड ...............८७२२................१०२७..............५२४९.............१४९९८

पिंपरी ................३४७८................३९६...............३००१............६८७५भोसरी ............ ६११२...............८७८.............५२८१.............१२२७१

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुमारे एक लाख ६० हजार जणांनी अर्ज केले आहेत. गेल्या नऊ महिन्यात सप्टेंबर अखेर मतदार यादीत हे बदल करण्यात आले आहेत. येत्या ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे.

- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी