शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आंबा महोत्सवातील ६३ स्टॉल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 18:54 IST

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  

ठळक मुद्दे दोन ते तीन हजार हजार पेट्या आंब्याचा कोळसा गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात महोत्सव सुरू

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड परिसरात शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या स्टॉलला शुक्रवारी सकाळी  साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महोत्सवातील तब्बल ६३ स्टॉल जळून खाक झाले. यामध्ये शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तब्बल दोन ते तीन हजार पेट्या आंब्यांचा पूर्णपणे कोळसा झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत आग आटोक्यात आणली.  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात हा महोत्सव सुरू होता. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील जवळपास ७३ ते ७५ शेतकरी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने एका स्टॉलमध्ये प्रत्येक शेतक-यांच्या सुमारे २५ ते ३० पेट्या ठेवल्या असल्याचे सांगण्यात आले. आंब्याची विक्री झाल्यानंतर आंब्याच्या रिकाम्या पेट्या तसेच गवत मोठ्या प्रमाणात आवारातच पडून होते. त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामध्ये, सर्व स्टॉल जळून खाक झाले.      पणन मंडळाच्या वतीने महोत्सवाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक सर्व योजना करण्यात आल्या होत्या. मात्र, लाकडी पेट्या, गवत तसेच मंडपाच्या कापडामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्यानंतर शेतक-यांनी काही प्रमाणात आंबा बाहेर हलविला. मोठ्या प्रमाणात आंबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी, शेतक-यांच्या जेवणाची व्यवस्था पणन मंडळ कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जे. जे. जाधव यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डMangoआंबाFarmerशेतकरीfireआग