शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:15 IST

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील एका सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे.

ठळक मुद्देअँबियन्स अँटिलीया सोसायटीचा प्रकल्प 

पुणे : स्मार्ट सिटी या योजनेला साजेशी अशी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील अँबियन्स अँटिलीया या सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे. या सोसायटीतील सभासदांच्या सहकायार्ने आर्थिक बाजूवर मात करत महिन्याला ५ हजार १०० युनिट वीज निर्मिती करणारा ४१.३ किलोवॅट क्षमतेचा आधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प इमारतीवर बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन  नुकतेचउपनिबंधक सहकारी संस्था चे दिग्विजय राठोड यांच्या हस्ते झाले.  नगरसेवक दिलीप वेडे, नगरसेविका अल्पना वरपे, चेअरमन संजय चौधरी, सेक्रेटरी गिरीश काळे, कमिटी सदस्य दीपक हर्डीकर आणि सोसायटी सभासद यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. महावितरण कडून सोसायटीची लागणारी वीज दिलेल्या विजेच्या युनिट मधून वजा करून उर्वरित बिल सोसायटी भरणार आहे. या माध्यमातून सोसायटीच्या वीजबिलात वषार्ला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये व्दिनपीक या आधुनिक कॅनडियन सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्याची क्षमता साधारण १८ टक्के एवढी आहे. या तंत्रज्ञानामुळे जरी सोलर वरती धूळ किंवासावली पडली तरी संपूर्ण प्लेट बंद न पडत उर्वरित प्लेट ऊर्जा निर्मिती करत राहते. तसेच भारतीय हवामानाची क्षमता (इफिशिअन्सी) लक्षात घेऊन म्हणजेच कितीही जोराचे वारे किंवा वादळ आले तरी ऊर्जा निर्मिती सुरूच राहील. या सोलर पॅनल ला इंटरनेटशी जोडल्याने दिवसभरात किती वीज निर्माण,  झाली किंवा आत्तापर्यंत किती निर्माण झाली हे पाहणे शक्य होणार आहे. असे दिपक हर्डीकर यांनी सांगितले या वेळी राठोड यांनी हा प्रकल्प राबविल्या बद्दल सर्व पदाधिकारी व सभासदाचे कौतुक केले. आणि इतर स?सायट्यानी या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.  हर्डीकर म्हणले कि अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरून उभारण्यात आलेला हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पास एकूण २२ लाख रुपये एवढा खर्च आला असून सर्व सभासदांनी एकत्र येत ४ महिन्यात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचा ५ वषार्चा देखभाल खर्च देखील खरेदी किमतीत असल्याने सोसायटीला त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही.  

चौकट- हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानउक्त असून याच्या माध्यमातून  वर्षभरात जवळपास ५१ टन कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचणार आहे. जर आंब्याचा झाडाचा विचार केला तर सुमारे ५ हजार शंभर झाडांमुळे एवढे कार्बन उत्सर्जन रोखू शकते ते या एका प्रकल्पाच्या माध्यमातून रोखणे शक्य होणार आहे  झाला ..........................गटाचा संबंध नाही.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण