शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:44 IST

राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी

पुणे: राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून जानेवारी महिना अखेरपर्यंत राज्यातील रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे.त्यात रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत,गहू पिक फुटवे फुटणे ते ओंबीच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा, बोंडे धरणे आणि काही ठिकाणे बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहेत.मात्र,पावसा आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांश पिकांच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे,असा अहवाल कृषी विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आला आहे.राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे राज्यात जानेवारी अखेरपर्यंत (दि.25) ६० टक्के रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात मका,ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव असून एकट्या सातारा जिल्ह्यात ३०३ हेक्टर क्षेत्रावर मका पिकावर आणि ४४.८ हेक्टर क्षेत्रावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात ऊस पिकावर १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.राज्यात कोकण विभागात ९४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून उन्हाळी भात व भुईमुग पिकांकरीता जमिनीच्या पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. तसेच विभागात काही ठिकाणी उन्हाळी भात रोपवाटीका तयार करण्याची कामे केली जात आहेत. नाशिक विभागात आत्तापर्यंत ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून हरभरा पिकावर घाटे अळी या किडीचा व मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. तसेच कोल्हापूर विभागात ७१ टक्के क्षेत्रावर ,लातूरमध्ये ७० टक्के,अमरावती विभागात ८८ तर नागपूर विभागात ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी २.६८ लाखे हेक्टर म्हणजेच केवळ ३५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

...............

पुणे विभागात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र १७.८३ लाखे हेक्टर असून २५ जानेवारी अखेरपर्यंत ७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे विभागात केवळ ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जमिनीतील ओलाख्या आभावा जिरायत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके सुकू लागली आहेत.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेती