शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:44 IST

राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी

पुणे: राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून जानेवारी महिना अखेरपर्यंत राज्यातील रब्बी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ६० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे.त्यात रब्बी ज्वारी पिक वाढीच्या,पोटरी ते दाणे भरणेच्या अवस्थेत,गहू पिक फुटवे फुटणे ते ओंबीच्या अवस्थेत तर करडई पीक फुलोरा, बोंडे धरणे आणि काही ठिकाणे बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहेत.मात्र,पावसा आभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांश पिकांच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे,असा अहवाल कृषी विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आला आहे.राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून आत्तापर्यंत ३३.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे राज्यात जानेवारी अखेरपर्यंत (दि.25) ६० टक्के रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात मका,ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव असून एकट्या सातारा जिल्ह्यात ३०३ हेक्टर क्षेत्रावर मका पिकावर आणि ४४.८ हेक्टर क्षेत्रावर लष्कर अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात ऊस पिकावर १४ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे.राज्यात कोकण विभागात ९४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून उन्हाळी भात व भुईमुग पिकांकरीता जमिनीच्या पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. तसेच विभागात काही ठिकाणी उन्हाळी भात रोपवाटीका तयार करण्याची कामे केली जात आहेत. नाशिक विभागात आत्तापर्यंत ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून हरभरा पिकावर घाटे अळी या किडीचा व मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. तसेच कोल्हापूर विभागात ७१ टक्के क्षेत्रावर ,लातूरमध्ये ७० टक्के,अमरावती विभागात ८८ तर नागपूर विभागात ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी २.६८ लाखे हेक्टर म्हणजेच केवळ ३५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

...............

पुणे विभागात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र १७.८३ लाखे हेक्टर असून २५ जानेवारी अखेरपर्यंत ७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे विभागात केवळ ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जमिनीतील ओलाख्या आभावा जिरायत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके सुकू लागली आहेत.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेती