शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नाशिकमधून हरवलेल्या ४ अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 22:10 IST

या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही...

ठळक मुद्देअपहरण झाल्याचा होता संशय; वडील रागावल्याने घरातून पलायन

पुणे : नाशिकमधून शुक्रवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान अपहरण झाल्याचा संशय असलेल्या १३ ते १५ वर्षांच्या ४ अल्पवयीन मुली स्वत:हून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुली बंडगार्डन पोलिसांना शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेचारला पुणेरेल्वे स्थानकावर मिळाल्या. यातील एकजण वडिलांनी रागावल्याने घरातून निघून आली होती तर उर्वरित तिघी तिला समजण्यासाठी आल्या होत्या.          या चारही मुली सातवी-आठवीत शिकत आहेत. कोमल मूनचून सिंग (वय १३, रा. रोशनी अपार्टमेंट, जयभवानी रस्ता, नाशिक), तमन्ना श्रीचंद राजोलिया (वय १४, रा. गजानन हाईट्स, जयभवानी रस्ता, नाशिक), पलक अमोल आवारे (वय १४) व भूमी विजय गायकवाड (वय १५, दोघीही रा. हरिदर्शन सोसायटी, जयभवानी रस्ता, नाशिक) अशी घरातून बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी कोमलची आई अनितादेवी मूनचून सिंग (वय ३६) यांनी शुक्रवारी मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या मुलींचे वर्णन, छायाचित्रे व मोबाईल क्रमांक इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवले. तसेच या मुलींच्या मोबाईलवरून त्या शनिवारी दुपारी साडेतीनला पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल विभागाजवळ असल्याचे समजले. त्यामुळे नाशिक पोलिसांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांना कळवले. या पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकातील नाईक यास्मिन खान व सारिका सोनवणे यांनी शोध घेतला असता, या मुली त्याठिकाणी आढळल्या नाहीत. या मुलींचा शोध घेत असताना साडेचारच्या सुमारास त्यांचे 'मोबाईल फोन लोकेशन' फलाट क्रमांक चारवर दाखवण्यात येत होते. खान व सोनवणे यांनी त्याठिकाणी तपास केला असता या मुली तेथे आढळून आल्या. या मुलींना ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कोमल सिंगला किरकोळ कारणावरून वडील रागावले होते. त्यामुळे ती घरातून निघून आली. तर उर्वरीत तिघी तिच्या मैत्रिणी आहेत. या तिघी कोमलला असे न करण्याबाबत समजावत होत्या. या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. या रेल्वेने त्या कल्याणला पोहचल्या. याठिकाणी उतरल्यावर त्यांनी पुण्याकडे येणारी रेल्वे पकडली. या गाडीने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या पुण्यात पोहचल्या. या मुलींना ताब्यात घेतले तेव्हा त्या खूप घाबरलेल्या, उपाशी व रात्रभर न झोपल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असे यास्मिन खान यांनी सांगितले. या मुली सापडल्याबाबत नाशिक पोलिस व त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे