शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिकमधून हरवलेल्या ४ अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 22:10 IST

या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही...

ठळक मुद्देअपहरण झाल्याचा होता संशय; वडील रागावल्याने घरातून पलायन

पुणे : नाशिकमधून शुक्रवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान अपहरण झाल्याचा संशय असलेल्या १३ ते १५ वर्षांच्या ४ अल्पवयीन मुली स्वत:हून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुली बंडगार्डन पोलिसांना शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेचारला पुणेरेल्वे स्थानकावर मिळाल्या. यातील एकजण वडिलांनी रागावल्याने घरातून निघून आली होती तर उर्वरित तिघी तिला समजण्यासाठी आल्या होत्या.          या चारही मुली सातवी-आठवीत शिकत आहेत. कोमल मूनचून सिंग (वय १३, रा. रोशनी अपार्टमेंट, जयभवानी रस्ता, नाशिक), तमन्ना श्रीचंद राजोलिया (वय १४, रा. गजानन हाईट्स, जयभवानी रस्ता, नाशिक), पलक अमोल आवारे (वय १४) व भूमी विजय गायकवाड (वय १५, दोघीही रा. हरिदर्शन सोसायटी, जयभवानी रस्ता, नाशिक) अशी घरातून बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी कोमलची आई अनितादेवी मूनचून सिंग (वय ३६) यांनी शुक्रवारी मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या मुलींचे वर्णन, छायाचित्रे व मोबाईल क्रमांक इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवले. तसेच या मुलींच्या मोबाईलवरून त्या शनिवारी दुपारी साडेतीनला पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल विभागाजवळ असल्याचे समजले. त्यामुळे नाशिक पोलिसांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांना कळवले. या पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकातील नाईक यास्मिन खान व सारिका सोनवणे यांनी शोध घेतला असता, या मुली त्याठिकाणी आढळल्या नाहीत. या मुलींचा शोध घेत असताना साडेचारच्या सुमारास त्यांचे 'मोबाईल फोन लोकेशन' फलाट क्रमांक चारवर दाखवण्यात येत होते. खान व सोनवणे यांनी त्याठिकाणी तपास केला असता या मुली तेथे आढळून आल्या. या मुलींना ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कोमल सिंगला किरकोळ कारणावरून वडील रागावले होते. त्यामुळे ती घरातून निघून आली. तर उर्वरीत तिघी तिच्या मैत्रिणी आहेत. या तिघी कोमलला असे न करण्याबाबत समजावत होत्या. या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. या रेल्वेने त्या कल्याणला पोहचल्या. याठिकाणी उतरल्यावर त्यांनी पुण्याकडे येणारी रेल्वे पकडली. या गाडीने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या पुण्यात पोहचल्या. या मुलींना ताब्यात घेतले तेव्हा त्या खूप घाबरलेल्या, उपाशी व रात्रभर न झोपल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असे यास्मिन खान यांनी सांगितले. या मुली सापडल्याबाबत नाशिक पोलिस व त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे