शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

नाशिकमधून हरवलेल्या ४ अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 22:10 IST

या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही...

ठळक मुद्देअपहरण झाल्याचा होता संशय; वडील रागावल्याने घरातून पलायन

पुणे : नाशिकमधून शुक्रवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान अपहरण झाल्याचा संशय असलेल्या १३ ते १५ वर्षांच्या ४ अल्पवयीन मुली स्वत:हून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुली बंडगार्डन पोलिसांना शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेचारला पुणेरेल्वे स्थानकावर मिळाल्या. यातील एकजण वडिलांनी रागावल्याने घरातून निघून आली होती तर उर्वरित तिघी तिला समजण्यासाठी आल्या होत्या.          या चारही मुली सातवी-आठवीत शिकत आहेत. कोमल मूनचून सिंग (वय १३, रा. रोशनी अपार्टमेंट, जयभवानी रस्ता, नाशिक), तमन्ना श्रीचंद राजोलिया (वय १४, रा. गजानन हाईट्स, जयभवानी रस्ता, नाशिक), पलक अमोल आवारे (वय १४) व भूमी विजय गायकवाड (वय १५, दोघीही रा. हरिदर्शन सोसायटी, जयभवानी रस्ता, नाशिक) अशी घरातून बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी कोमलची आई अनितादेवी मूनचून सिंग (वय ३६) यांनी शुक्रवारी मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी या मुलींचे वर्णन, छायाचित्रे व मोबाईल क्रमांक इतर जिल्ह्यातील पोलिसांना पाठवले. तसेच या मुलींच्या मोबाईलवरून त्या शनिवारी दुपारी साडेतीनला पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल विभागाजवळ असल्याचे समजले. त्यामुळे नाशिक पोलिसांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांना कळवले. या पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकातील नाईक यास्मिन खान व सारिका सोनवणे यांनी शोध घेतला असता, या मुली त्याठिकाणी आढळल्या नाहीत. या मुलींचा शोध घेत असताना साडेचारच्या सुमारास त्यांचे 'मोबाईल फोन लोकेशन' फलाट क्रमांक चारवर दाखवण्यात येत होते. खान व सोनवणे यांनी त्याठिकाणी तपास केला असता या मुली तेथे आढळून आल्या. या मुलींना ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कोमल सिंगला किरकोळ कारणावरून वडील रागावले होते. त्यामुळे ती घरातून निघून आली. तर उर्वरीत तिघी तिच्या मैत्रिणी आहेत. या तिघी कोमलला असे न करण्याबाबत समजावत होत्या. या चौघीही नाशिक रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीत बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी ही रेल्वे सुटल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. या रेल्वेने त्या कल्याणला पोहचल्या. याठिकाणी उतरल्यावर त्यांनी पुण्याकडे येणारी रेल्वे पकडली. या गाडीने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या पुण्यात पोहचल्या. या मुलींना ताब्यात घेतले तेव्हा त्या खूप घाबरलेल्या, उपाशी व रात्रभर न झोपल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असे यास्मिन खान यांनी सांगितले. या मुली सापडल्याबाबत नाशिक पोलिस व त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे