शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुणे - सातारा महामार्गावरील सारोळा येथे पट्टेरी वाघाच्या कातड्याची विक्री करणारे ४ जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 20:05 IST

गोपनीय माहितीच्या आधारे सारोळा उड्डाण पुलाखाली पोलिसांनी सापळा लावून वाघाच्या कातडी विक्रीसाठी आलेल्या चार व्यक्तींना हालचाली सुरू असताना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देआरोपीकडून ४ फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे, वरच्या जबड्यात १३ दात व खालच्या जबड्यात १६ दात असे एका पट्टेरी वाघाचे कातडे जप्त

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील सारोळा येथील उड्डाण पुलाच्या खाली पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करून विक्री करणारी टोळीला जेरबंद करण्यात  स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघाच्या कातडीसह मुद्देमाल ताब्यात घेऊन चार जणांना अटक केले आहे. 

सातारा जिल्ह्यातील दिनेश अशोक फरांदे (वय ३८,रा.ओझर्डे), हसन रज्जाक मुल्ला (वय ३५,रा.ओझर्डे), गणपत सदू जुनगरे (वय ४५,रा.देवदेव पो.मामुर्डे) सुनील दिनकर भिलारे (वय ५२, रा.भिलार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपीनाय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पुणे - सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही व्यक्ती पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या माहितीच्या आधारे सारोळा उड्डाण पुलाखाली पोलिसांनी सापळा लावून वाघाच्या कातडी विक्रीसाठी आलेल्या चार व्यक्तींना हालचाली सुरू असताना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४ फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे, वरच्या जबड्यात १३ दात व खालच्या जबड्यात १६ दात असे एका पट्टेरी वाघाचे कातडे, एक मोटारसायकल व ४ मोबाईल फोन असे एकूण ५ लाख २६ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला. याबाबत नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना माहिती देण्यात आली असून आले असून आरोपींना पुढील कारवाईसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीTigerवाघ