शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: June 24, 2015 05:13 IST

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़

जुन्नर / आपटाळे : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहार व त्याचबरोबर प्रसाद म्हणून दिलेल्या शिऱ्यातून ३१ मुलांना विषबाधा झाली़ या १६ मुले व १५ मुलींवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ मुलांबरोबरच २ शिक्षिका आणि एका पालकावरही उपचार करण्यात येत आहे़ त्यात एका मुलाची प्रकृती गंभीर आहे़ या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़ पोषण आहारातून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकांसह तिघांविरुद्ध ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मुख्याध्यापक शिवाजी दामोदर डुंबरे, ज्येष्ठ शिक्षक भगवान सखाराम रेंगडे आणि आहार पुरविणाऱ्या सुरेखा चंद्रकांत डोंगरे अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी विस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८, किरकोळ व गंभीर स्वरुपाची विषबाधा झाल्याबद्दल कलम ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बल्लाळवाडी येथील या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात़ गेल्या आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर, नियमितपणे मुलांना पोषण आहार दिला जातो़ त्याप्रमाणे सर्वांना पोषण आहार दि. २२ जून रोजी दुपारी देण्यात आला़ त्याच बरोबर आहार बनविणाऱ्या सुरेखा डोंगरे यांनी त्यांच्या घरी २१ जून रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून शिरा या विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिला़ त्यानंतर सर्व मुले घरी गेली़ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज सकाळी नेहमी प्रमाणे भरली; परंतु विद्यार्थी संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर कमी असल्याचे शाळेतील वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांच्या लक्षात आले़ कारण, पटसंख्या ८७ आहे. मुले एवढी कमी कशी आली, याची त्यांनी घरी जाऊन पालकांना विचारणा केली असता, अनेक मुलांना २२ जून रोजी रात्रीपासून उलटी, जुलाब, चक्कर असा प्रकार होत असल्याचे लक्षात आले़ ८७ पैकी ७० मुलांनी खाऊ खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला़ हे लक्षात येताच, पालकांची व शिक्षकांची पळापळ सुरू झाली़ उपसरपंच संजय नायकोडी यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली व विद्यार्थ्यांना जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ. शिंगोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले़ त्यामुळे सध्या विषबाधित असलेले विद्यार्थी धोकादायक परिस्थितीच्या बाहेर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्याम बनकर यांनी सांगितले. उपचारासाठी दाखल असलेल्या मुल-मुली ही साधारण पाच ते नऊ वर्षं वयोगटांतील असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : वैशाली नायकोडी, रोहन नायकोडी, सिद्धी डोंगरे,विनायक गावडे, आदित्य बोऱ्हाडे, संस्कार डोंगरे, सानिका साळवे, तन्मय गावडे, श्रेया नायकोडी, शुती परिहार, परिमल ससाणे, ज्ञानदा नायकोडी, आविष्कार डोंगरे, राखी आहेर, सूरज नवले, पीयूष डोंगरे, दीपक गाडेकर, यश डोंगरे, रोशनी गावडे, सानिका शिंदे, राहुल शिंदे, धनंजय नायकोडी, श्रावनी कुटे, ज्ञानेश्वरी नायकोडी, साहील नवले, विवेक गावडे, सानिका नायकोडी, आरिया आहेर, सुशीला मुंढे, कृष्णा डोंगरे, सुमीत रोकडे व शिक्षिका लता हांडे, माधुरी पडवळ, पालक शशिकला ससाणे या सर्वांवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी डॉ. सुनील शेवाळे, डॉ़ सागर शिंदे, डॉ़ कमलाकर, डॉ. शिंगोटे यांनी उपचार केले.दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, घडलेला प्रकार अतिशय चटका लावणारा असून, विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा तपास झाल्यावर दोषींची गय केली जाणार नाही, अशी माहिती आशाताई बुचके यांनी दिली.