शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: August 9, 2023 16:32 IST

अन्यथा न्यायालयात लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार...

पुणे : काेरोना संपत आल्यावर राज्याच्या आराेग्य विभागाने रेमडेसिवीर औषधांची खरेदी केली. त्यापैकी पुणे शहर व जिल्ह्याला ३० काेटी रुपयांची २ लाख ४० हजार व्हायल्स दिल्या. परंतु, हा औषध साठा मुदतबाह्य होणार असल्याचे कळवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या ३० कोटींच्या रेमडेसिवीर कालबाह्य झाल्याने औषधाच्या कालबाह्य साठ्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, तसेच आरोग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांचे निलंबन करावे, अन्यथा न्यायालयात लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

संभूस पुढे म्हणाले की, आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या रेमडेसिवीरच्या साठ्यापैकी ४६ टक्के साठा पुण्याला दिला हाेता. ताे साठा यावर्षी ३० एप्रिल राेजी कालबाह्य हाेणार हाेता. त्यापूर्वी महिन्याआधीच मनसेने आरोग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांना कळवले होते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी समिती स्थापन केली. या समितीने साठा कालबाह्य झाल्याचा अहवाल दिला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊनही काहीच कार्यवाही नाही. मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत, असे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

आराेग्य खात्याच्या लक्षात आणून देऊनही ताे साठा परत कंपनीला केला नाही. मेडिकलमधून कालबाह्य हाेत आलेला साठा कंपन्या परत घेतात; मग शासनाकडून का नाही. म्हणजेच या औषध खरेदी प्रकरणात खरेदी-विक्रीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याला आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक जबाबदार आहेत. हा नागरिकांच्या पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे.

- हेमंत संभूस, सरचिटणीस, मनसे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडremdesivirरेमडेसिवीरTanaji Sawantतानाजी सावंतCorona vaccineकोरोनाची लस