शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:47 IST

किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही

पुणे: गेल्या वर्षभरात पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही. महामार्ग पोलिस पुणे विभागांतर्गत २०२२ वर्षाची ही नोंद आहे.

महामार्गावरून प्रवास करत असताना वाहतूक नियमांचे पालन न करणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, अपघात प्रवण क्षेत्र यामुळे अनेक अपघात होत आहेत. याची नोंद महामार्ग पोलिसांकडून ठेवली जाते. पुणे विभागात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या खंडाळा आणि वडगाव केंद्रादरम्यान झालेले हे अपघात आहेत.

अपघात रोखण्यासाठी...

- द्रुतगती मार्गावर तुटलेले रोप बॅरियर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी साईन बोर्ड बसवण्यासाठी आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्ग पाेलिसांनी हे काम पूर्ण करून घेतले.- टोलनाक्यांवर थांबून विनासीटबेल्ट वाहन चालवणाऱ्यांचे प्रबोधन केले, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.- द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांनी लेन कटिंग करू नये, यासाठी शासकीय वाहनांच्या ध्वनिक्षेपकांवरून आवाहन केले. तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.- महामार्गावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांवर पेट्रोलिंगच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, तसेच ती वाहने लगेच हटवण्यात आली.- सीटबेल्ट न लावणाऱ्या तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी यांचे पथक सुरू केले.

एकूण अपघात, मृत्यूंची संख्या आणि जखमी..

पुणे विभागातील खंडाळा आणि वडगाव या दोन ठिकाणी वर्षभरात ४५ अपघात झाले. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू