शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

सरकारमध्ये २३२ आमदार; आता कोणी कुठे गेले तरी सरकारला फरक पडणार नाही - अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: January 31, 2025 19:07 IST

बहुमतासाठी १४५ आकडा आवश्यक असतो, महायुतीकडे बहुमत असून २३२ आमदारांची संख्या आहे

पुणे: विधानसभा निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले आहे. २३२ आमदारांची संख्या आहे. बहुमतासाठी १४५ आकडा आवश्यक आहे. त्यामुळे हे सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून पवार म्हणाले, “आता कोणी कुठे जाणार नाही आणि येणार नाही. कोणी गेले तरी सरकारला फरक पडणार नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षांत चांगले नियोजन करून काम करता येईल.” गेल्या काही दिवसांपासून शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरून पवार यांनी नाव न घेता चिमटा काढल्याचे दिसून आले आहे. नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

देशामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा तिसरा क्रमांक लागतो. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २०५४ पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दोन कोटींच्या वर जाणार आहे. या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, कचरा तसेच वाहतुकीचे प्रश्न उग्र होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे लागेल. ही कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नगर रचना विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिंगरोड, मेट्रो, रस्ते यांचे नियोजन करावे, अशी सूचना उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केली.

राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांची नोंद पुण्यात होत आहे. काही दिवसांनी या शहरात फिरणेही मुश्कील होईल, अशा शब्दांत चिंता व्यक्त करत. शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे सूतोवाचही त्यांनी केले. राज्यातील शहरांचा वाढता बकालपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर नेमके बोट ठेवत ही भविष्यातील आपल्या पुढील आव्हाने असल्याचे पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

नाहीतर पुढची पिढी आपल्याला दोषी ठरवेल

दोन कोटी लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे तसेच पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान असल्याचे सांगून ते म्हणाले, “१९९१ मध्ये पुणे शहराला ५ टीएमसी पाणी पुरत होते. त्याच शहराला आज २१ टीएमसी पाणीपुरवठा करावा लागत आहे. भविष्यात ही मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही मागणी कशी पुरविणार हा प्रश्न आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. वीजनिर्मिती बंद करून पिण्याचा पाणी पुरवठा करावा लागेल, अशी स्थिती आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वाहतूक कोंडीत पुणे देशात तिसऱ्या क्रमांकावर पोचले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नगररचना विभागाने काम केले पाहिजे. नाही तर पुढची पिढी आपल्याला दोषी ठरवेल.”

निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही

शहरांसमोरील आव्हाने मोठी आहेत, ती सोडविण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगून पवार म्हणाले, “विकासाबाबत असे निर्णय घेताना मोठा विरोध होतो. आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पाच वर्षे सत्ताधाऱ्यांना आपली गरज नाही, अशी ओरड सुरू होते. परंतु असे निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही. ते निर्णय घ्यावेच लागतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliticsराजकारण