रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:00 IST2025-05-31T09:00:41+5:302025-05-31T09:00:51+5:30

३१ मेची मुदत, वाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे

23 percent of ration customers e KYC incomplete | रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का?

रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का?

पुणे : शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात ७७टक्केच जणांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे २३ टक्के ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मेनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा असल्याने मुदतवाढीबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी, अशांना धान्य मिळणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

दोनदा मुदतवाढ देऊनही काम राहिले अपूर्णच

ई-केवायसी पूर्ण होत नसल्याने ३१ एप्रिल आणि ३१ मे अशी दोनवेळी सरकारने मुदतवाढ देण्यात आली. तरीही अजून सुमारे २७ टक्के ग्राहकांनी ई-केवायसी केली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत.

अहवाल सांगतो : राज्यात ३० मेच्या अहवालानुसार, रेशन ग्राहकांची एकूण संख्या ६ कोटी ८५ लाख ३६ हजार ५५० इतकी आहे. त्यातील ५ कोटी २६ लाख ६३ हजार ४६६ ग्राहकांनी (७६.८४ टक्के) ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर अजूनही १ कोटी ७७ लाख १ हजार ५४९ ग्राहकांचे (२३.१६) ई-केवायसी प्रलंबित आहे.

Web Title: 23 percent of ration customers e KYC incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.