पुणे : यंदाच्या मृग बहरातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जांपैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी विभागाने केलेल्या पडताळणीतून स्पष्ट झाले आहे. या अपात्र अर्जांद्वारे तब्बल ९ हजार ६५२ हेक्टर क्षेत्रावर बनावट फळपीक विमा काढण्यात आला होता. हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण १३ कोटी ६० लाख रुपयांचा विमा हप्ता वाचला आहे. या अपात्र अर्जांमध्ये सर्वाधिक ७ हजार ३३४ अर्ज जालना जिल्ह्यातील आहेत.
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी या १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू होती. त्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै होती. त्यानुसार राज्यात ७३ हजार ६८६ अर्ज आले होते. मात्र, प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार प्रत्यक्ष पडताळणी केली.
या अपात्र अर्जांद्वारे ९६५२.३२ हेक्टरवरील पिकांचा बनावट विमा उतरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकूण १३ कोटी ६० रुपयांचा विमा हप्त्याची बचत झाली आहे.
त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा ६ कोटी ८८ कोटी, राज्य सरकारचा हिस्सा ३ कोटी ४० लाख तर केंद्र सरकारचा हिस्सा ३.३२ कोटी रुपये आहे.
या अपात्र अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यात एकूण १८ हजार ९२२ अर्ज आले होते. त्यातील ७ हजार ३३४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
७३ हजार ६८६ पैकी १६ हजार ६२० ठिकाणी बागांची लागवड झाली नसल्याचे तसेच प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा काढण्यात आल्याचेही दिसून आले. काही ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना त्याचाही विमा काढला असल्याचे आढळले आहे.
जिल्हानिहाय अपात्र अर्जजिल्हा अपात्र वाचलेला विमा अर्ज हप्ता (रुपयांत)अकोला १७ ५९३६०अमरावती ५२ ३३८९५०संभाजीनगर १३७२ १०८९५४१०धाराशिव २६ ४२०१०नागपूर ६२ ११४५१०परभणी ८८२ २६८४९०अहिल्यानगर ३११६ २२४८६४५३बीड ५२८ ४८८४५२७बुलढाणा ३१ ३९८७८१धुळे ८ ९५२३२लातूर ४ १९२२०नाशिक २४८ १८३३०२०पालघर २१ ३७८७९५पुणे ३८९ ३२५२५६१सांगली ४३३ ५८३७०५७सातारा ५३७ २९७६१९६सोलापूर २२९७ ११७३४५६७ठाणे ४९ ९७८१८०वाशिम ५ २९०७०हिंगोली १९ ७९४००जळगाव ३६ १८५१६२वर्धा १ १०८०जालना ७४४३ ६९१९१०५५एकूण १६६२० १३६०४५०३९