शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शहरात निर्माण होतोय दररोज २१०० टन कचरा; मात्र ५१८ टन कचऱ्यावरच प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 4:25 AM

कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

पुणे : शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन कचरा गोळा होत असून, प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावरच होत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात समोर आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण दिले जात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले.नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमुळे दररोज निर्माण होणाºया कचºयामध्येदेखील वाढ झाली आहे. सध्या शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन इतका प्रचंड कचरा निर्माण होतो. यामध्ये ई-कचरा, जैववैद्यकीय कचरा अशा विविध प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे. यात पालखी, दिवाळी, दसरा अशा विविध सण-समारंभादरम्यान दररोज कचºयामध्ये २०० ते ३०० टनाने वाढ होते. याशिवाय १५० ते १८० टन बांधकाम क्षेत्रातील, ५० ते ६० टन गार्डन वेस्ट आणि ५ ते ६ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो.महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यासाठी शहरात विविध ठिकाणी अनेक लहान-मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यात आले. परंतु यातील ५० टक्क्यांहून अधिक प्रकल्प हे नेहमीच विविध कारणांनी बंद असतात. त्यामुळे शहरात दररोज २ हजार टनपेक्षा कचरा निर्माण होत असताना प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावर होते. दरम्यान, शहरात निर्माण होणाºया कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी संस्थेला हे काम करण्यात आले आहे. परंतु शहरात केवळ ६३ टक्केच कचºयाचे वर्गीकरण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.जैववैद्यकीय ५० टक्केच कचºयावर प्रक्रियाशहरातील सुमारे ४०० ठिकाणांहून विविध हॉस्पिटल, दवाखान्यांमधून जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो. शहरामध्ये दररोज सुमारे ६ टनपेक्षा अधिक जैववैद्यकीय कचरा गोळा होतो. परंतु यापैकी सध्या केवळ ३ टन कचºयावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिकेच्याच पर्यावरण अहवालात म्हटले आहे. जैववैद्यकीय कचरा पर्यावरण आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.शहरात वर्षाला १० हजार टन ई-वेस्टआयटी शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुण्यात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ‘ई-वेस्ट’ कचºयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यात दरवर्षी तब्बल १० हजार टन हा ई-वेस्ट निर्माण होत असून, या कचºयाची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या सध्या महापालिकेच्या समोर आहे. कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात. तसेच काही भागांत यामुळे पाण्याचे स्रोतदेखील दूषित होत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नPuneपुणे