शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

१४ धरणे भरली; उजनी २३ टीएमसीवर, डिंभे धरणातून १७,८०० क्युसेक्सने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:24 IST

धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील तीन धरणांसह जिल्ह्यातील १४ धरणे भरली आहेत.

पुणे : धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील तीन धरणांसह जिल्ह्यातील १४ धरणे भरली आहेत. जिल्ह्यातील १५ धरणांतून पाणी सोडण्यात येत असून, उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २३.२४ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) पोहोचला आहे.पिंपळगाव जोगे पाणलोट क्षेत्रात ६, माणिकडोह २८, येडगाव १२, वडज २१, डिंभे ४१, कळमोडी १९, चासकमान २४, वडीवळे १४, पवना २३, मुळशी २०, टेमघर २१, वरसगाव ३, पानशेत ४, खडकवासला २ आणि नीरा देवघरला ११ मिलिमीटर पाऊस गुरुवारी दिवसभरात झाला. गुरुवारी सकाळी आठपर्यंत कळमोडी १२, वडीवळे ४५, आंद्रा १५, पवना ३४, कासारसाई ७, मुळशी २५, टेमघर ४६, वरसगाव १६, पानशेत २०, खडकवासला ५, गुंजवणी ११ आणि नीरा देवघरला ३० मिलिमीटर पाऊस झाला.कळमोडी १.५१, चासकमान ७.५७, भामा आसखेड ७.१६, वडीवळे १.०७, आंद्रा २.९२, पवना ८.५१, वरसगाव १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७, नीरा देवघर ११.७३, भाटघर २३.५० आणि वीर धरणात ९.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. डिंभे १२.३८ (९९.०९), कासारसाई ०.५६ (९८.५७ टक्के), मुळशी १८.४१ (९९.७५ टक्के) ही धरणे जवळपास भरली आहेत.खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर (२.१७ टीएमसी) या चारही धरणांतील पाणीसाठा २७.६२ टीएमसीवर (९४.७४ टक्के) गेला आहे. सायंकाळी पाचपर्यंत वरसगाव धरणातून १ हजार ७७७, पानशेत ३ हजार ९०८ आणि खडकवासला धरणातून ४ हजार २८० क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुळा-मुठा नदी दुथडी वाहत होती. वडज ५७७, डिंभे १३ हजार ३६५, कळमोडी २ हजार, चासकमान ४ हजार ८७३, वडीवळे २ हजार ८३, पवना दीड हजार आणि मुळशीतून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.वीर धरणातून १३ हजार ९९१, नीरा देवघर ७ हजार ९३८ आणि भाटघरमधून २ हजार ३२९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २३.२४ टीएमसी (४३.३७ टक्के) झाला आहे.घोडेगाव : डिंभे धरण पूर्ण भरले असून, धरणातून १७,८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग घोड नदीत सोडण्यात आला आहे़ या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे़आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांबरोबरच अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊ स सुरू आहे़ यामुळे डिंभे धरणात १४,००० क्युसेक्सने पाणी येत आहे़ या पाण्यामुळे घोड नदी दुधडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता के. आऱ कानडे यांनी आवाहन केले आहे, की अचानकसुरू झालेल्या पावसामुळे धरणातून मोठा विसर्ग सोडावा लागला आहे़ यासाठी नदीकाठच्या गावांनी दक्ष राहावे, नागरिकांनी नदीकाठी फिरू नये़ तसेच कुकडी प्रकल्पात ंिडंभे धरण हे महत्त्वाचे असूनत्त्यावर मोठा भाग अवलंबून आहे़या वर्षी हे धरण वेळेत व पूर्ण क्षमतेने भरले आहे.चासकमानचे पाचही दरवाजे उघडलेचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे भीमा नदीसह आरळा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यामुळे चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.५ वाजता सांडव्याद्वारे ९,१२५ क्युसेक्स वेगाने विसर्ग वाढवून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तर, धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५७५ व कालव्याद्वारे नदीपात्रात २७५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर संततधार सुरू असल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टीएमसी क्षमता असलेले हे धरण प्रथम २१ जुलै रोजी ९६.९० टक्के भरल्याने ५,२७५ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला होता. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण