शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत.

पुणे : खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शेतीच्या पाण्यात कपात न करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतीला तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात खडकवासला कालवा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.खडकवासला प्रकल्पातून शेतीबरोबरच प्रामुख्याने पुणे शहरासाठीदेखील पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे कालवा समितीच्या बैठकीत अनेक वेळा शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पाहायला मिळतो. यावेळी देखील शहरातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा पवित्रा घेतला. तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी पाण्यावर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा हक्क असून, पुणेकरांनी अत्यंत काटकसरीने पाणी वापरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)४सध्या धरणात उपलब्ध असलेल्या २०.५४ टीएमसी पाणीसाठ्यातून शेतीसाठी एक रब्बी आणि दोन उन्हाळी आवर्तनासाठी ११.८० टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.४खडकवासला प्रकल्पातून वरसगाव, पानशेत, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सुमारे ६२ हजार १४६ हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.४यामध्ये रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतात. रब्बी हंगामातील ४५ दिवसांचे एक आवर्तन यापूर्वीच देण्यात आले असून, आता तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने खडकवासला प्रकल्पात सरासरीपेक्षा ७ ते ८ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांसह शेतकऱ्यांनीदेखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला. यामध्ये शहरातील पाणीगळती थांबविण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरित उपाय-योजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. तर, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ड्रीपवर शेती करण्याचा सूचना दिल्या. ८ हजार हेक्टर येणार ओलिताखालीमुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. त्यामुळे शहराचे अथवा शेतीचे पाणी कपात करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. -वृत्त/८