शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत.

पुणे : खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शेतीच्या पाण्यात कपात न करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतीला तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात खडकवासला कालवा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.खडकवासला प्रकल्पातून शेतीबरोबरच प्रामुख्याने पुणे शहरासाठीदेखील पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे कालवा समितीच्या बैठकीत अनेक वेळा शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पाहायला मिळतो. यावेळी देखील शहरातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा पवित्रा घेतला. तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी पाण्यावर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा हक्क असून, पुणेकरांनी अत्यंत काटकसरीने पाणी वापरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)४सध्या धरणात उपलब्ध असलेल्या २०.५४ टीएमसी पाणीसाठ्यातून शेतीसाठी एक रब्बी आणि दोन उन्हाळी आवर्तनासाठी ११.८० टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.४खडकवासला प्रकल्पातून वरसगाव, पानशेत, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सुमारे ६२ हजार १४६ हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.४यामध्ये रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतात. रब्बी हंगामातील ४५ दिवसांचे एक आवर्तन यापूर्वीच देण्यात आले असून, आता तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने खडकवासला प्रकल्पात सरासरीपेक्षा ७ ते ८ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांसह शेतकऱ्यांनीदेखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला. यामध्ये शहरातील पाणीगळती थांबविण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरित उपाय-योजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. तर, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ड्रीपवर शेती करण्याचा सूचना दिल्या. ८ हजार हेक्टर येणार ओलिताखालीमुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. त्यामुळे शहराचे अथवा शेतीचे पाणी कपात करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. -वृत्त/८