शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण विभाग अव्वल, नागपूर तळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 5:56 AM

१५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के

मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागातील ९८.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यात कोकण विभागाने अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.७३ टक्के, तर पुणे विभागाची टक्केवारी ९५.६४ टक्के आहे. नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के असा सर्वांत कमी निकाल लागला आहे.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीसाठी ६७ विषयांत आणि आठ माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती.

९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीवराज्यातील ९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यात मुंबई सर्वाधिक ६७, औरंगाबाद २५, नागपूर २ आणि पुणे १ यांचा समावेश आहे, तर ३ विद्यार्थी डिबार ठरले आहेत.

३३,३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटीयंदाच्या दहावीच्या परीक्षेत ८६ हजार ५९४ विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार असून, ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. पुनर्परीक्षार्थी जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले, तरच अकरावीचा अर्ज भरता येणार आहे. मात्र, एटीकेटी राहिलेले विद्यार्थी अकरावीचा अर्ज भरू शकतील

ठाण्याच्या गौतमीला मिळाले १०० टक्के गुण

ठाणे : ठाण्यातील गाैतमी संदीप सहस्रबुद्धे या विद्यार्थिनीने एसएससी बाेर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर नंबरी यश मिळवले आहे. गाैतमीने १०० टक्के गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले आहे. तिचे सर्वच स्तरांतून काैतुक करण्यात येत आहे. 

शहरातील बी केबिन परिसरातील ब्राह्मण सोसायटीत राहणारी गौतमी ही ए. के. जोशी शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’मधील विषयांत ४८८ आणि अभ्यासेतर उपक्रमातील १२, असे ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. गौतमीने शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. गौतमीला गायन आणि नृत्यकलेची आवड असून, गायन परीक्षेत तिला १२ गुण मिळाले आहेत. 

गौतमीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या पाच आणि कथ्थकच्या पाच परीक्षा दिल्या आहेत. अभ्यास आणि छंद यांची योग्य सांगड घालत तिने हे यश संपादन केले आहे. 

नववीपर्यंत अभ्यासाचे जे वेळापत्रक होते तेच दहावीसाठी कायम ठेवले होते, असे तिची आई गौरी यांनी सांगितले. आई- वडिलांबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे गाैतमी हिने सांगितले. दरम्यान, गौतमीची आई गौरी आणि वडील संदीप यांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहे. 

‘इंजिनीअर हाेण्याची इच्छा’विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून, भविष्यात इंजिनीअर होण्याची इच्छा आहे, असे गाैतमीने सांगितले. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती; पण १०० टक्के मिळतील, असे वाटले नव्हते, असेही ती म्हणाली.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालMaharashtraमहाराष्ट्र