शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:55 AM

पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे.

ठळक मुद्दे विद्यापीठाने कोल्हापूर,सांगलीतील दहा गावे घेतली दत्तक

पुणे : महापुरामुळे बाधित झालेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील रहिवाशांना मानसिक धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आठवडाभर दहा गावांमध्ये जाणार आहेत.पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहेत.तसेच या गावांमध्ये स्वच्छता शिबिरांच्या माध्यमातून गाव स्वच्छ करणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले.अनेकांनी आपले पाळीव प्राणी गमावले आहेत.येथील शेकडो घरे पडली असून शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत लोकांना धीर देण्यासाठी विद्यापीठाचे एक हजार विद्यार्थी जाणार आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे यांच्यासह इतर सहका-यांच्या समन्वयाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठातर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपतकालीन भागातील नागरिकांना मदत केली जाते. सध्य स्थितीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना मदतीच्या हातांची गरज आहे.त्यामुळे पुणे विद्यापीठाचे एकूण एक हजार विद्यार्थी पुढील तीन ते चार महिने या भागात काम करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट केले जातील. सात-आठ दिवस काम केलेल्या विद्यार्थ्यांना परत बोलवले जाईल.त्यानंतर नवीन गटातील विद्यार्थ्यांना पाठविले जाईल.टप्प्या-टप्प्याने विद्यापीठाकडून एकूण एक हजार विद्यार्थी येथे काम करण्यासाठी जातील. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने पुरग्रस्त भागाची पहाणी केली असून त्यानुसार मदतीचे नियोजन करण्यात आले आहे.डॉ.संजय चाक णे म्हणाले, विद्यापीठाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी येत्या २२ ते २८ आॅगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील तेरवाड, राजापूर, राजापूर वाडी, टाकळी, आकिवट तसेच, सांगली जिल्ह्यातील वाळवा, बोरगाव, शिरगाव, भिलवडी, औदुंबर या गावांमध्ये जाणार आहेत. विद्यार्थी येथील पुरग्रस्तांशी बोलून त्यांची दु:खे समजून घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी समुपदेशन, पथनाट्य यांचा मार्ग अवलंबण्यात येणार येईल. याशिवाय गावातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लाववतील.तसेच गावक-यांच्या लहान-मोठ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या गोष्टींवरही विद्यार्थ्यांकडून भर दिला जाईल.

टॅग्स :Puneपुणेfloodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीnitin karmalkarनितीन करमळकर