शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:00 IST

पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे.

ठळक मुद्दे विद्यापीठाने कोल्हापूर,सांगलीतील दहा गावे घेतली दत्तक

पुणे : महापुरामुळे बाधित झालेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील रहिवाशांना मानसिक धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आठवडाभर दहा गावांमध्ये जाणार आहेत.पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहेत.तसेच या गावांमध्ये स्वच्छता शिबिरांच्या माध्यमातून गाव स्वच्छ करणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले.अनेकांनी आपले पाळीव प्राणी गमावले आहेत.येथील शेकडो घरे पडली असून शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत लोकांना धीर देण्यासाठी विद्यापीठाचे एक हजार विद्यार्थी जाणार आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे यांच्यासह इतर सहका-यांच्या समन्वयाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठातर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपतकालीन भागातील नागरिकांना मदत केली जाते. सध्य स्थितीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना मदतीच्या हातांची गरज आहे.त्यामुळे पुणे विद्यापीठाचे एकूण एक हजार विद्यार्थी पुढील तीन ते चार महिने या भागात काम करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट केले जातील. सात-आठ दिवस काम केलेल्या विद्यार्थ्यांना परत बोलवले जाईल.त्यानंतर नवीन गटातील विद्यार्थ्यांना पाठविले जाईल.टप्प्या-टप्प्याने विद्यापीठाकडून एकूण एक हजार विद्यार्थी येथे काम करण्यासाठी जातील. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने पुरग्रस्त भागाची पहाणी केली असून त्यानुसार मदतीचे नियोजन करण्यात आले आहे.डॉ.संजय चाक णे म्हणाले, विद्यापीठाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी येत्या २२ ते २८ आॅगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील तेरवाड, राजापूर, राजापूर वाडी, टाकळी, आकिवट तसेच, सांगली जिल्ह्यातील वाळवा, बोरगाव, शिरगाव, भिलवडी, औदुंबर या गावांमध्ये जाणार आहेत. विद्यार्थी येथील पुरग्रस्तांशी बोलून त्यांची दु:खे समजून घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी समुपदेशन, पथनाट्य यांचा मार्ग अवलंबण्यात येणार येईल. याशिवाय गावातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लाववतील.तसेच गावक-यांच्या लहान-मोठ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या गोष्टींवरही विद्यार्थ्यांकडून भर दिला जाईल.

टॅग्स :Puneपुणेfloodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीnitin karmalkarनितीन करमळकर