शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:00 IST

पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे.

ठळक मुद्दे विद्यापीठाने कोल्हापूर,सांगलीतील दहा गावे घेतली दत्तक

पुणे : महापुरामुळे बाधित झालेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील रहिवाशांना मानसिक धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आठवडाभर दहा गावांमध्ये जाणार आहेत.पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहेत.तसेच या गावांमध्ये स्वच्छता शिबिरांच्या माध्यमातून गाव स्वच्छ करणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले.अनेकांनी आपले पाळीव प्राणी गमावले आहेत.येथील शेकडो घरे पडली असून शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत लोकांना धीर देण्यासाठी विद्यापीठाचे एक हजार विद्यार्थी जाणार आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे यांच्यासह इतर सहका-यांच्या समन्वयाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठातर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपतकालीन भागातील नागरिकांना मदत केली जाते. सध्य स्थितीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना मदतीच्या हातांची गरज आहे.त्यामुळे पुणे विद्यापीठाचे एकूण एक हजार विद्यार्थी पुढील तीन ते चार महिने या भागात काम करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट केले जातील. सात-आठ दिवस काम केलेल्या विद्यार्थ्यांना परत बोलवले जाईल.त्यानंतर नवीन गटातील विद्यार्थ्यांना पाठविले जाईल.टप्प्या-टप्प्याने विद्यापीठाकडून एकूण एक हजार विद्यार्थी येथे काम करण्यासाठी जातील. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने पुरग्रस्त भागाची पहाणी केली असून त्यानुसार मदतीचे नियोजन करण्यात आले आहे.डॉ.संजय चाक णे म्हणाले, विद्यापीठाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी येत्या २२ ते २८ आॅगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील तेरवाड, राजापूर, राजापूर वाडी, टाकळी, आकिवट तसेच, सांगली जिल्ह्यातील वाळवा, बोरगाव, शिरगाव, भिलवडी, औदुंबर या गावांमध्ये जाणार आहेत. विद्यार्थी येथील पुरग्रस्तांशी बोलून त्यांची दु:खे समजून घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी समुपदेशन, पथनाट्य यांचा मार्ग अवलंबण्यात येणार येईल. याशिवाय गावातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लाववतील.तसेच गावक-यांच्या लहान-मोठ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या गोष्टींवरही विद्यार्थ्यांकडून भर दिला जाईल.

टॅग्स :Puneपुणेfloodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीnitin karmalkarनितीन करमळकर