शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:59 IST

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हवरून टोला; राज्यपालांचा मान राखावा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय; पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील विधानाची आठवण करून देत, ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत खरंच पोहोचत नाही, हेच आम्ही सव्वावर्षापासून सांगत आहोत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत हाणला.


राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केला. राज्यात कोरोना वाढत असताना सरकार मात्र केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न होते. कोरोना उपाययोजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. अमरावतीत कोरोनाचे खोटे अहवाल दिले जात आहेत. अव्वाच्या सव्वा दराने खरेदी, वस्तू भाड्याने घेण्याचे प्रकार घडले. १,२०० रुपये किमतीचे थर्मामीटर ६,५०० रुपयांत घेण्यात आले. दोन लाख रुपये खर्चून खरेदी करता येण्याजोग्या चादरींसाठी साडेआठ लाख रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी अभिभाषणातून मांडलेले मुद्दे ही पोकळ माहिती आहे. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधता येत नाही, असे ते म्हणाले. 


राज्यपाल व्यक्ती नव्हे तर  व्यवस्था असते आणि त्यांचा मान राखला जाणे अपेक्षित असते; परंतु त्यांना विमान नाकारणे अधिकच गंभीर होते. इतका कोतेपणा सरकारने कधीही दाखविला नाही, अशी टीका त्यांनी केली. कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर किमान ३० हजार मृत्यू टाळता आले असते. आता लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. शिवजयंती अन् मंदिरे उघडी ठेवल्यानेच कोरोना वाढतो, हा अजब तर्क असल्याचे ते म्हणाले. 

देशभक्तीच्या ट्वीटचा अभिमान
भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी टूलकिटवाल्यांना प्रत्युत्तरात देशभक्तीचे ट्वीट केले, त्यात काय गुन्हा केला?  सरकार त्यांची चौकशी करणार हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच आम्ही त्यांची नाही तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करीत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तेव्हा, देशभक्तीचे ट्वीट करण्यामागे भाजप आहे तर मग मला त्याचा अभिमान आहे, तुमच्या चौकशांना आम्ही घाबरत नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

मंत्री टेंडर ठरवतात म्हणून कुलगुरूंचे राजीनामे
खात्याचे मंत्रीच विद्यापीठांतील कामांचे कंत्राट ठरवायला लागले आहेत. आपल्या कार्यक्रमांसाठी ते विद्यापीठांना वेठीस धरत आहेत. दबावापायी दोन कुलगुरूंनी राजीनामे दिले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

पूजा चव्हाणप्रकरणी निलंबनाची मागणी
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी एफआयआर न नोंदविणाऱ्या वानवडी; पुणे ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा. १२ ऑडिओ क्लिप आहेत, थेट पुरावे आहेत मग आणखी काय पाहिजे, गुन्हा का नोंदवत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे