शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:59 IST

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हवरून टोला; राज्यपालांचा मान राखावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय; पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील विधानाची आठवण करून देत, ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत खरंच पोहोचत नाही, हेच आम्ही सव्वावर्षापासून सांगत आहोत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत हाणला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केला. राज्यात कोरोना वाढत असताना सरकार मात्र केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न होते. कोरोना उपाययोजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. अमरावतीत कोरोनाचे खोटे अहवाल दिले जात आहेत. अव्वाच्या सव्वा दराने खरेदी, वस्तू भाड्याने घेण्याचे प्रकार घडले. १,२०० रुपये किमतीचे थर्मामीटर ६,५०० रुपयांत घेण्यात आले. दोन लाख रुपये खर्चून खरेदी करता येण्याजोग्या चादरींसाठी साडेआठ लाख रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी अभिभाषणातून मांडलेले मुद्दे ही पोकळ माहिती आहे. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधता येत नाही, असे ते म्हणाले. 

राज्यपाल व्यक्ती नव्हे तर  व्यवस्था असते आणि त्यांचा मान राखला जाणे अपेक्षित असते; परंतु त्यांना विमान नाकारणे अधिकच गंभीर होते. इतका कोतेपणा सरकारने कधीही दाखविला नाही, अशी टीका त्यांनी केली. कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर किमान ३० हजार मृत्यू टाळता आले असते. आता लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. शिवजयंती अन् मंदिरे उघडी ठेवल्यानेच कोरोना वाढतो, हा अजब तर्क असल्याचे ते म्हणाले. 

देशभक्तीच्या ट्वीटचा अभिमानभारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी टूलकिटवाल्यांना प्रत्युत्तरात देशभक्तीचे ट्वीट केले, त्यात काय गुन्हा केला?  सरकार त्यांची चौकशी करणार हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच आम्ही त्यांची नाही तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करीत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तेव्हा, देशभक्तीचे ट्वीट करण्यामागे भाजप आहे तर मग मला त्याचा अभिमान आहे, तुमच्या चौकशांना आम्ही घाबरत नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

मंत्री टेंडर ठरवतात म्हणून कुलगुरूंचे राजीनामेखात्याचे मंत्रीच विद्यापीठांतील कामांचे कंत्राट ठरवायला लागले आहेत. आपल्या कार्यक्रमांसाठी ते विद्यापीठांना वेठीस धरत आहेत. दबावापायी दोन कुलगुरूंनी राजीनामे दिले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

पूजा चव्हाणप्रकरणी निलंबनाची मागणीपूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी एफआयआर न नोंदविणाऱ्या वानवडी; पुणे ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा. १२ ऑडिओ क्लिप आहेत, थेट पुरावे आहेत मग आणखी काय पाहिजे, गुन्हा का नोंदवत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे