शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:51 IST

सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते.

गौरीशंकर घाळेमुंबई : सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यावर नेहमीच्या राजकारणाला चेव चढला आहे. लाॅकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे झालेले हाल, रोजगाराचा प्रश्न, कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार यासोबतच बाॅलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेना, मेट्रो कारशेड आणि ईडीच्या नोटिसांभोवती यावर्षीचे राजकारण फिरत राहिले.

राज्यात महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग

राज्यात महाविकास आघाडीचा नवा राजकीय प्रयोग सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. वाॅर्ड आणि विभागस्तरावरील नेते, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था आहे. आघाड्यांच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे स्थानिक पातळीवरील नेते सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ याच भूमिकेत आहेत. निवडणुका एकत्र लढण्याची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असली तरी काँग्रेसने भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजप सध्याचे संख्याबळ राखण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. कृष्णकुंजवर शिष्टमंडळांचा राबता वाढला असला तरी त्याचा निकालात लाभ उठविण्यासाठी संघटनेची जोड देण्याचे आव्हान मनसेसमोर कायम आहे.

राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

राज्यात सत्ता येताच राष्ट्रवादीने मुंबईवर लक्ष केंद्रित केले. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पालिका निवडणुकीचे बिगुलही वाजविले गेले. पण, लाॅकडाऊनमुळे त्याला ब्रेक लागला. आता सत्तेच्या माध्यमातून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्र्यांचा जनता दरबार याकामी पूरक ठरेल असा होरा आहे. मुंबई अध्यक्ष  नवाब मलिक यांनी स्थानिक पातळीवर आक्रमकपणे संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पाठीराखे पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मातोश्रीला सत्तेचे कवच

कोरोना काळात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत पालिकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमुळे हिंदुत्व त्यागले नाही, हा संदेश देण्याची एकही संधी वाया जाणार नाही याची खबरदारी शिवसेना नेतृत्वाकडून घेतली जात आहे. जोडीला मराठीचा मुद्दा तेवत ठेवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कंगना रनौत प्रकरण अनावश्यकपणे अंगावर ओढवून घेतल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यावर भर दिला गेला. 

भाजप- जुन्या शिलेदारांचे काय होणार?  

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद आहे.  रस्त्यावरील राजकारणाच्या त्यांच्या मर्यादा लक्षात घेता आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे प्रभारी पद सोपविण्यात आले. विनोद तावडे यांची राष्ट्रीय राजकारणात पाठवणी झाली आहे. तर, मागील पालिका निवडणुका गाजविणारे आशिष शेलार काहीसे बाजूला फेकले गेल्याची चर्चा आहे. शह-काटशह भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा