शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ

By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 12:31 PM

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याची तयारी सुरू

मुंबई: लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. यानंतर आता राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारनं लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा केल्यावर त्याचा अभ्यास करू, असं राऊत म्हणाले.लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील सरकारं लव्ह जिहादविरोधात कायदा करणार आहेत. त्यानंतर आता भाजपचे राज्यातील नेतेही लव्ह जिहादविरोधी कायदा कधी करणार, असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारत आहेत. याबद्दल मी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कायदा होऊ दे. त्यानंतर बिहारमध्ये कायदा होऊ दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करू. यानंतर राज्य सरकार चर्चा करून निर्णय घेईल,' असं राऊत यांनी सांगितलं.'बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार यांना आम्ही भाजपचे मुख्यमंत्री समजतो. कारण सर्वाधिक आमदार भाजपचे असल्यानं सरकारवर त्यांचंच नियंत्रण आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिहार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा करू दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात लव्ह जिहादचा प्रश्न मोठा नाही. अर्थव्यवस्था, मंदी, बेरोजगारी, महामाई यासारख्या अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्या देशासमोर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.वाढीव वीज बिलांविरोधात आज राज्यभरात भाजपची आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. वाढीव वीज बिल प्रश्नावरून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटावं, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी इंधन दरांकडेही लक्ष वेधलं. 'आम्ही वाढीव वीज बिलावरून जनतेला दिलासा देऊ. पण भाजपच्या नेत्यांनी इंधन दराकडे लक्ष द्यावं. त्यातूनही जनतेला दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही कमी व्हायला हवेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल, डिझेलचे दर ४५ ते ५० रुपये असायला हवेत. यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,' असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा