शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मीच केले म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार का? शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 17:30 IST

Chipi Airport: चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे.

सावंतवाडी : चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग जिल्हयात येते. त्यामुळे केंद्र सरकार विमान वाहातूकीस परवानगी देत असले तरी रस्ते पाणी हे राज्य सरकारच पुरवत आहेत. त्यामुळे कोण मी करणार असे म्हणत असेल तर ते शक्य नाही. सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने चिपी विमानतळ सुरू होणार असून, मी म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार नाहीत. त्यांंना चिपीतच यावे लागेल, असा जोरदार टोला राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला आहे.

ते मळगाव येथे शिवसेना पदाधिकाºयांच्या आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, विक्रांत सावंत उपस्थीत होते.

मंत्री सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे. या विमानतळाकडे जाणाºया रस्ता, पाणी, विज यासाठी सरकार तसचे आमदार, खासदार नियोजनचा फंड खर्च झाला आहे. त्यामुळे सर्व काहि मीच करणार असे म्हणने योग्य नाही. विमानतळ सुरू करणे हा सांघिक प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून सुरू करूया असे म्हणने योग्य ठरणार आहे. मी केले म्हणतात ते विमान दिल्लीतून उडवणार आहेत का, त्यांना चिपीतच यावे लागणार आहे. असा टोला ही सामंत यांनी लगावला आहे.

मागील काहि वर्षात प्रलंबित राहिलेले सर्व प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन येत्या महिनाभरात होणार असून, त्यासाठी १ कोटि ४९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेजचा जलद मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्र्यानी स्वत: लक्ष घालून हा शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न सोडवून दिला. या महाविद्यालयासाठी लागणारे डिनही नेमण्यात आले आहेत. तसेच येत्या काहि महिन्यात आम्ही प्रवेश प्रकियाही सुरू करणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. आता हा प्रस्ताव मेडिकल कौन्सीलकडे जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे ओरोस येथेच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जे बोलत होते त्यांनी आतापर्यत काय केले हा प्रश्न त्यांनाच द्यावा लागेल. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी सांघिक प्रयत्न करून विकासकामे कुठे थांबता नये यासाठी प्रयत्न केले. चांदा ते बांदा योजना ही सुरू होणार आहे. मात्र त्या योजनेचे नाव काय असावे याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. मी व आमदार दीपक केसरकर हे मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याना भेटून याबाबतची माहीती दिली असून या योजनेवर निर्णय घेण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतChipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणे