शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 22:09 IST

BJP Devendra Fadnavis: दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

ठळक मुद्देसध्यातरी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न मांडत आहोत.भाजपासोबत युती करावी ही प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे अनेकांची इच्छा आहे.कुणी जोडे मारावे आणि कुणाला हार घालावे हे त्यांनी ठरवावं. आमची बांधिलकी जनतेशी आहे

मुंबई – घोटाळ्याच्या प्रकरणावरून कित्येक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका पत्रानं राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत आघाडी करावी अशी मागणी केली आहे. इतकचं नाही तर प्रताप सरनाईक यांनी पत्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीवरही गंभीर आरोप लावले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम केले जातंय असं त्यांनी म्हटलं होतं.(BJP Devendra Fadnavis Reaction on Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray over Demand of Shivsena BJP Alliance)

दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, भाजपासोबत युती करावी ही प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे अनेकांची इच्छा आहे. परंतु हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सध्यातरी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. विधानसभा निकालात आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्या परंतु बहुमत नव्हतं. मात्र आगामी काळात आम्ही बहुमतानं निवडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपा स्वबळावरच लढत आहे. त्यामुळे कुणी जोडे मारावे आणि कुणाला हार घालावे हे त्यांनी ठरवावं. आमची बांधिलकी जनतेशी आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.

प्रताप सरनाईक यांनी पत्रात काय म्हटलं?

'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे. 'भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं. आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. काही चुकले असल्यास दिलगिरी,' असं सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सध्याच्या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर यास्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असं माझं वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

राज्यात आपली सत्ता असतानासुद्धा राज्य शासनाचे आणि इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना, कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं हे प्रताप सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpratap sarnaikप्रताप सरनाईक