शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?”

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 13:58 IST

Coronavirus, Temple Reopening Issue, MNS Bala Nandgoankar, CM Uddhav Thackeray News: हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देबार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगीपुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता, मनसेचा सवाल आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल - भाजपा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन सुरु होतं, मात्र आता हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेत राज्य सरकार विविध गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेत आहे, मात्र अद्यापही मंदिरांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने मनसेने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले की, पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आंदोलन करण्यात येणार होते, मात्र याठिकाणी कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात आली, याठिकाणी भाजपा ज्याठिकाणी आंदोलन करणार तेथील मंडपही प्रशासनाने काढून घेतला. त्यामुळे भाजपाला हे आंदोलन स्थगित करावं लागलं. मात्र आंदोलन स्थगित करताना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

तुषार भोसले म्हणाले की, आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल. सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात येत होतं, आम्ही कुणाला घाबरत नसून भाविकांची गैरसोय नसावी म्हणून आंदोलन स्थगित करत आहे, मात्र मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या सरकारला कोणाविषयी संवेदना उरल्या नाहीत, साधुसंतांनाही अटकेची धमकी दिली जाते, पत्रकारांना अटक होते, सरकारमुळे कोणताही घटक संतुष्ट नसेल तर निश्चितच मुघलांपेक्षा आणि ब्रिटिशांपेक्षा हे वाईट सरकार आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर केला.

भाजपाच्या आरोपाचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत. मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध... जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते असा सवालही राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी भाजपाला केला आहे. थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे मग मंदिरांनीच काय केले असा सवालही करत आहेत परंतु मंदिरात येणारा भाविक असतो त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही. वास्तविक कुठल्याही मंदिराचा वास्तू रचनेतून पाहिले तर आतला गाभारा हा लहान असतो. तिरुपती देवस्थानासारखं रांगेत या लांबून दर्शन घ्या ही पद्धत आपल्याकडे नाही. आपल्या धार्मिक स्थळावर त्याला एसओपी म्हणतात तसं तयार केलेले नाही, एखादा राजकीय पक्ष अशाप्रकारच्या भूमिका कशासाठी घेतो. अध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते वाहिन्यांवर उघड मुलाखती देतात. कुठेतरी वास्तवाकडे गेलं पाहिजे. परमेश्वर जसा तुमचा आहे तसा तो सगळ्यांचा आहे. श्रध्दा सगळ्यांचीच परंतु असं ओंगळ प्रदर्शन करण्याची गरज नाही असे सांगतानाच त्यावर मार्ग शोधला पाहिजे, समजुतीने घेतले पाहिजे. सरकार यावर मार्ग काढणार आहे याबद्दल खात्री बाळगली पाहिजे असंही राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितले.

 

टॅग्स :MNSमनसेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिर