शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?”

By प्रविण मरगळे | Updated: November 6, 2020 13:58 IST

Coronavirus, Temple Reopening Issue, MNS Bala Nandgoankar, CM Uddhav Thackeray News: हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देबार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगीपुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता, मनसेचा सवाल आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल - भाजपा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन सुरु होतं, मात्र आता हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेत राज्य सरकार विविध गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेत आहे, मात्र अद्यापही मंदिरांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने मनसेने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले की, पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आंदोलन करण्यात येणार होते, मात्र याठिकाणी कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात आली, याठिकाणी भाजपा ज्याठिकाणी आंदोलन करणार तेथील मंडपही प्रशासनाने काढून घेतला. त्यामुळे भाजपाला हे आंदोलन स्थगित करावं लागलं. मात्र आंदोलन स्थगित करताना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

तुषार भोसले म्हणाले की, आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल. सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात येत होतं, आम्ही कुणाला घाबरत नसून भाविकांची गैरसोय नसावी म्हणून आंदोलन स्थगित करत आहे, मात्र मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या सरकारला कोणाविषयी संवेदना उरल्या नाहीत, साधुसंतांनाही अटकेची धमकी दिली जाते, पत्रकारांना अटक होते, सरकारमुळे कोणताही घटक संतुष्ट नसेल तर निश्चितच मुघलांपेक्षा आणि ब्रिटिशांपेक्षा हे वाईट सरकार आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर केला.

भाजपाच्या आरोपाचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत. मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध... जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते असा सवालही राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी भाजपाला केला आहे. थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे मग मंदिरांनीच काय केले असा सवालही करत आहेत परंतु मंदिरात येणारा भाविक असतो त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही. वास्तविक कुठल्याही मंदिराचा वास्तू रचनेतून पाहिले तर आतला गाभारा हा लहान असतो. तिरुपती देवस्थानासारखं रांगेत या लांबून दर्शन घ्या ही पद्धत आपल्याकडे नाही. आपल्या धार्मिक स्थळावर त्याला एसओपी म्हणतात तसं तयार केलेले नाही, एखादा राजकीय पक्ष अशाप्रकारच्या भूमिका कशासाठी घेतो. अध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते वाहिन्यांवर उघड मुलाखती देतात. कुठेतरी वास्तवाकडे गेलं पाहिजे. परमेश्वर जसा तुमचा आहे तसा तो सगळ्यांचा आहे. श्रध्दा सगळ्यांचीच परंतु असं ओंगळ प्रदर्शन करण्याची गरज नाही असे सांगतानाच त्यावर मार्ग शोधला पाहिजे, समजुतीने घेतले पाहिजे. सरकार यावर मार्ग काढणार आहे याबद्दल खात्री बाळगली पाहिजे असंही राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितले.

 

टॅग्स :MNSमनसेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिर