शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तर कर्नाटकातील भाजपचा वारू काँग्रेस रोखणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:02 IST

काँग्रेसला परत मिळवायचा आहे बालेकिल्ला; गतनिवडणुकीत भाजपने जिंंकल्या होत्या ११ जागा

- पोपट पवार शिमोगा : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत लिंंगायत समाजाच्या पाठबळावर उत्तर कर्नाटकातील १४ पैकी तब्बल ११ जागा जिंंकून एकेकाळच्या काँग्रेसच्याच बालेकिल्ल्याला भगदाड पाडणाऱ्या भाजपचा उत्तर कर्नाटकातील वारू रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. येत्या २३ एप्रिल रोजी उत्तर कर्नाटकातील १४ जागांसाठी तिसºया टप्प्यांत मतदान होणार आहे.माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा, बी. एस. येडियुुरप्पा, धरङ्कसिंंह, काँग्रेसचे संसदेतील नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या प्रांताचे प्रतिनिधित्व केल्याने मुंबई कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक म्हणून ओळखला जाणारा हा उत्तर प्रांत कर्नाटकच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. लिंंगायत समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असलेल्या उत्तर कर्नाटकाने स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा हात नेहमीच बळकट केला आहे. मात्र, देशाच्या राजकारणात भाजपला दक्षिणेचा दरवाजा पहिल्यांदा खुला करून देणाºया कर्नाटकात भाजपने आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केल्यानंतर उत्तर कर्नाटकाने त्याला पहिल्यांदा साथ दिली अन् येथील काँग्रेसचे अनेक बुरूज ढासळले गेले. अर्थात, भाजपने जातीय समीकरणांचा आधार घेतल्यानेच या प्रांतात काँग्रेसेतर पक्षाकडे मतदार आकर्षिले गेले होते.उत्तर कर्नाटकातील भाजपची वाढलेली लोकप्रियता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लिंंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेल्या निर्णयासाठी लिंंगायतबहुल भागात अपेक्षित यश मिळाले नसल्याने काँग्रेस चिंंतेत आहे. स्वतंत्र धर्माच्या मुद्यावरून वीरशैव-लिंंगायत यांच्यात सुरु असलेला वादही त्याला कारणीभूत असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. लिंंगायत-वीरशैव यांच्या वादात काँग्रेसने पडायलाच नको होते, असे सांगत काँग्रेसचे वजनदार मंत्री डी. के. शिवकुमार यांनी माफी मागितल्याने काँग्रेसअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वतंत्र लिंंगायत धर्माची मागणी करणाºया काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवकुमार यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवित नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मंत्री ए. बी. पाटील यांनी २०१७ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले कथित पत्र व्हायरल झाल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. या पत्रात भाजप आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाला रोखण्यासाठी हिंदू धर्मात फूट पाडण्याची गरज आहे. स्वतंत्र लिंंगायत धर्माचे आंदोलन पेटले तरच काँग्रेसला लाभ होईल, असा मजकूर आहे. अर्थात, हे पत्र खोटे असून आपल्या विरुद्ध रचलेले हे कटकारस्थान असल्याचा आरोप पाटील यांनी केला असला तरी भाजपने हाच मुद्दा उचलत प्रचाराचे रान तापवले.खुद्द नरेंद्र मोदी यांनीही या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी उत्तर कर्नाटकात प्रचाराची राळ उडवून दिल्याने येथील अनेक जागांवर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. उत्तर कन्नडमध्ये तब्बल ५ वेळा विजय मिळवणारे भाजपचे अनंतकुमार हेगडे यांच्यासमोर जेडीएसच्या आनंद असनोटीकर यांनी तगडे आव्हान उभे केल्याने येथील लढतही रंगतदार होण्याची शक्यता आहे. धारवाडमधून भाजपच्या प्रल्हाद जोशी यांच्यासमोर स्वतंत्र लिंंगायत धर्माचे पुरस्कर्ते विनय कुलकर्णी यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या लढतीनेही लक्ष वेधले आहे.बेल्लारी कुणाकडे...१९९९ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यातील लढतीने रंगतदार बनलेला हा मतदारसंघ. खाणसम्राट रेड्डी बंधूंच्या अचाट संपत्तीने देशाचे डोळे दीपवणाºया या मतदारसंघात यंदा भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत होत आहे. काँग्रेसकडून वी. एस. उगरप्पा तर भाजपकडून वाय. देवेंद्रप्पा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या श्रीरामुलू यांनी विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, विधानसभेसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाने आपला कौल काँग्रेसच्या पारड्यात टाकला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस