शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 2:31 PM

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्देआता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागातन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे.

मुंबई:  आत्तापासून एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेस शिवाय महापौर नाही, असा  ठाम विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकताच जोगेश्वरीत व्यक्त केला. मुंबईतील प्रत्येक घरात पोहचण्यासाठी लवकरच प्रत्येक वार्डात पदयात्रा काढणार आहे अशी माहिती त्यांनी  जोगेश्वरीतील उत्तर पश्चिम कार्यकर्ता मेळाव्यात दिली.यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व बलदेव खोसा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष कलाइव्ह डायस तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागा, असा स्वबळाचा पुरुच्चार भाई जगताप त्यांनी या मेळाव्यात केला. 

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था डबगाईला पोहचली आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस सिलेंडर ७०० रुपये झाला, पेट्रोल ९३ रुपये पोहचले, भाजप जातीयवाद, भाषा वाद व प्रांत वाद पसरवतात, काँग्रेस नेहमी सर्व धर्म समभाव विचाराने चालते, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाते, भेदभाव करत नाही. इस्त्रायल दूतावासात बॉम्बस्फोट झाला, या प्रकरणात दिल्ली पोलिसांचे व गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शहाचे अपयश असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केली.     माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मनपा निवडणूक समोर आहे, काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. आपण भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या दोघांच्या सोबत आहे. तन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे. मुंबईत आजही काँग्रेस सर्वात मोठी पार्टी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबई