शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:33 IST

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्देआता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागातन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे.

मुंबई:  आत्तापासून एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेस शिवाय महापौर नाही, असा  ठाम विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकताच जोगेश्वरीत व्यक्त केला. मुंबईतील प्रत्येक घरात पोहचण्यासाठी लवकरच प्रत्येक वार्डात पदयात्रा काढणार आहे अशी माहिती त्यांनी  जोगेश्वरीतील उत्तर पश्चिम कार्यकर्ता मेळाव्यात दिली.यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व बलदेव खोसा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष कलाइव्ह डायस तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागा, असा स्वबळाचा पुरुच्चार भाई जगताप त्यांनी या मेळाव्यात केला. 

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था डबगाईला पोहचली आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस सिलेंडर ७०० रुपये झाला, पेट्रोल ९३ रुपये पोहचले, भाजप जातीयवाद, भाषा वाद व प्रांत वाद पसरवतात, काँग्रेस नेहमी सर्व धर्म समभाव विचाराने चालते, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाते, भेदभाव करत नाही. इस्त्रायल दूतावासात बॉम्बस्फोट झाला, या प्रकरणात दिल्ली पोलिसांचे व गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शहाचे अपयश असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केली.     माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मनपा निवडणूक समोर आहे, काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. आपण भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या दोघांच्या सोबत आहे. तन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे. मुंबईत आजही काँग्रेस सर्वात मोठी पार्टी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबई